शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

प्रत्येक हंगामात 'बळीराजा'ची कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ...

यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ते २४ या पाच दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामाची धूळधाण केली. १० हजार ९१८ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. ८३ गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे केले गेले. तीन हजार ६३० हेक्टरवरील पिकांचे हातातोंडाशी आलेले घास मातीमोल झाले. फळबागांसह ज्वारी, कांदा, मका, केळी आदी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आभाळ दाटून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही शासनाच्या मदतीचा छदामही भेटलेला नाही. एकंदरीतच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. कोरोना महामारीत जगाची पावले थांबली असताना बळीराजा मात्र अन्नदाता म्हणून अजिबात थांबला नाही. त्यामुळेच लॉकडाऊन असतानाही अन्नधान्य असो की, भाजीपाला, दूध, फळे जनतेला मिळत आहे. यावर्षी तालुक्यात ९० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी शेतकरी सरसावले असले तरी, कृषी विभागाने एक जूननंतरच अशी लागवड करावी, असे आवाहन केले आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे बोगस बियाणे, खते आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचा जीव दरवर्षी टांगणीला लागतो. यंदाही हे संकट टळलेले नाही. रासायनिक खतांचा १० टक्के वापर कमी करावयाचे धोरण असल्याने खतांची टंचाई जाणवणार आहे. जास्त मागणी काळ्या बाजाराला खतपाणी घालणारी ठरते. दरवर्षी बोगस बियाणे, खते देऊन शेतकऱ्यांना लुबाडले जातेच. बारोमास हे होत आले आहे. पुढेही चालूच राहणार आहे. असेच काहीसे चित्र आहे