शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक हंगामात 'बळीराजा'ची कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ...

यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ते २४ या पाच दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामाची धूळधाण केली. १० हजार ९१८ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. ८३ गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे केले गेले. तीन हजार ६३० हेक्टरवरील पिकांचे हातातोंडाशी आलेले घास मातीमोल झाले. फळबागांसह ज्वारी, कांदा, मका, केळी आदी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आभाळ दाटून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही शासनाच्या मदतीचा छदामही भेटलेला नाही. एकंदरीतच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. कोरोना महामारीत जगाची पावले थांबली असताना बळीराजा मात्र अन्नदाता म्हणून अजिबात थांबला नाही. त्यामुळेच लॉकडाऊन असतानाही अन्नधान्य असो की, भाजीपाला, दूध, फळे जनतेला मिळत आहे. यावर्षी तालुक्यात ९० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी शेतकरी सरसावले असले तरी, कृषी विभागाने एक जूननंतरच अशी लागवड करावी, असे आवाहन केले आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे बोगस बियाणे, खते आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचा जीव दरवर्षी टांगणीला लागतो. यंदाही हे संकट टळलेले नाही. रासायनिक खतांचा १० टक्के वापर कमी करावयाचे धोरण असल्याने खतांची टंचाई जाणवणार आहे. जास्त मागणी काळ्या बाजाराला खतपाणी घालणारी ठरते. दरवर्षी बोगस बियाणे, खते देऊन शेतकऱ्यांना लुबाडले जातेच. बारोमास हे होत आले आहे. पुढेही चालूच राहणार आहे. असेच काहीसे चित्र आहे