शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

प्रत्येक हंगामात 'बळीराजा'ची कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ...

यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ते २४ या पाच दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामाची धूळधाण केली. १० हजार ९१८ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. ८३ गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे केले गेले. तीन हजार ६३० हेक्टरवरील पिकांचे हातातोंडाशी आलेले घास मातीमोल झाले. फळबागांसह ज्वारी, कांदा, मका, केळी आदी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आभाळ दाटून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही शासनाच्या मदतीचा छदामही भेटलेला नाही. एकंदरीतच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. कोरोना महामारीत जगाची पावले थांबली असताना बळीराजा मात्र अन्नदाता म्हणून अजिबात थांबला नाही. त्यामुळेच लॉकडाऊन असतानाही अन्नधान्य असो की, भाजीपाला, दूध, फळे जनतेला मिळत आहे. यावर्षी तालुक्यात ९० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी शेतकरी सरसावले असले तरी, कृषी विभागाने एक जूननंतरच अशी लागवड करावी, असे आवाहन केले आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे बोगस बियाणे, खते आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचा जीव दरवर्षी टांगणीला लागतो. यंदाही हे संकट टळलेले नाही. रासायनिक खतांचा १० टक्के वापर कमी करावयाचे धोरण असल्याने खतांची टंचाई जाणवणार आहे. जास्त मागणी काळ्या बाजाराला खतपाणी घालणारी ठरते. दरवर्षी बोगस बियाणे, खते देऊन शेतकऱ्यांना लुबाडले जातेच. बारोमास हे होत आले आहे. पुढेही चालूच राहणार आहे. असेच काहीसे चित्र आहे