शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डॉक्टर नसल्याने मानसोपचार विभागालाच टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

जळगाव : नियुक्त एकमेव वरिष्ठ निवासी डॉक्टर रजेवर गेल्याने, शिवाय ते परत येत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार ...

जळगाव : नियुक्त एकमेव वरिष्ठ निवासी डॉक्टर रजेवर गेल्याने, शिवाय ते परत येत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागामुळे आता प्रशासनाचा तणाव वाढणार असल्याचे चित्र आहे. या विभागाचा भार औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या विविध विभागांमध्ये मनुष्यबळ हा मुद्दा नॉन कोविडनंतर आता हळूहळू समोर येत असल्याचे चित्र आहे. महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील करार हा पुन्हा तीन वर्षांच्या नूतनीकरणासाठी पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. मात्र, तीही पुरेशी नसल्याने प्राध्यापक, डॉक्टरांवर अतिरिक्त भार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे मानसिक रुग्णांना मात्र, योग्य वैद्यकीय सेवा मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाविद्यालय व रुग्णालयात अन्य यंत्रणा, अन्य सुविधा सुधारत असताना डॉक्टरांची कमतरता हा मुद्दा डोकेदुखी वाढविणारा ठरणार असल्याचे चित्र आहे.

विभागाचे एकही तज्ज्ञ डॉक्टर नाहीत

नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार दीडशे विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक, एक सहयोगी आणि एक सहायक प्राध्यापक अशी यंत्रणा हवी. मात्र, गंभीर बाब म्हणजे मानसोपचार विभागात आता एकही तज्ज्ञ डॉक्टर, प्राध्यापक नाही. हा विभाग औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अंतर्गत येत असल्याने या डॉक्टरांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या विभागाचे एकमेव वरिष्ठ निवासी डॉ. दिलीप महाजन हे रजेवर गेल्याने हा विभाग आता पूर्णत: रिकामा झाला आहे.