शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रुग्णाच्या मृत्यूमुळे ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण ...

मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण वाघ (४२,रा. लोहारखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेऊन नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले होते. दिवसभराच्या घडामोडी व पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने मात्र आरोपांचे खंडन केले आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण वाघ यांना १३ एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर १ मे रोजी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याच काळात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना बोलावण्यात आले तेव्हा ते मयत झालेले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच वाघ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे शालक सुनील विक्रम पवार (रा.वावडदा) यांनी केला आहे.

*पोलीस ठाण्यात एक तास चर्चा*

वाघ यांचा मृत्यू झाल्यानंतर सुनील विक्रम पवार व शिवसेनेचे रवींद्र कापडणे (रा. वावडदा) यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून त्यांनी मागणी केली. पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या दालनात तासभर चर्चा झाली, मात्र कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कापडणे व पवार यांनी केला. शेवटी संध्याकाळी रवींद्र कापडणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी याबाबत निर्णय घेऊ असे ठरवल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.

कोट...

अतिदक्षता विभाग मोठा आहे. त्यामुळे डॉक्टर व स्टाफ प्रत्येक रुग्णाकडे जात असतात. काही सेकंदच फक्त तेथे कोणी नव्हते आणि त्याच वेळी नातेवाईक तेथे आले. दुर्दैवाने ही घटना घडली. मात्र त्यात डॉक्टरांचा काही दोष नाही.

- डॉ. प्रशांत बोरोले, ऑर्किड हॉस्पिटल

कोट.....

मेहुण्याची तब्येत अतिशय ठणठणीत झालेली होती. दुपारी अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी नसल्याने त्याच वेळेस त्यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा कमी झाला की काय माहिती नाही, मात्र त्यांच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी.

- सुनील विक्रम पवार, मयताचे शालक