शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

रुग्णाच्या मृत्यूमुळे ऑर्किड हॉस्पिटलमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण ...

मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण वाघ (४२,रा. लोहारखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेऊन नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले होते. दिवसभराच्या घडामोडी व पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने मात्र आरोपांचे खंडन केले आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण वाघ यांना १३ एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर १ मे रोजी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याच काळात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना बोलावण्यात आले तेव्हा ते मयत झालेले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच वाघ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे शालक सुनील विक्रम पवार (रा.वावडदा) यांनी केला आहे.

*पोलीस ठाण्यात एक तास चर्चा*

वाघ यांचा मृत्यू झाल्यानंतर सुनील विक्रम पवार व शिवसेनेचे रवींद्र कापडणे (रा. वावडदा) यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून त्यांनी मागणी केली. पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या दालनात तासभर चर्चा झाली, मात्र कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कापडणे व पवार यांनी केला. शेवटी संध्याकाळी रवींद्र कापडणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी याबाबत निर्णय घेऊ असे ठरवल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.

कोट...

अतिदक्षता विभाग मोठा आहे. त्यामुळे डॉक्टर व स्टाफ प्रत्येक रुग्णाकडे जात असतात. काही सेकंदच फक्त तेथे कोणी नव्हते आणि त्याच वेळी नातेवाईक तेथे आले. दुर्दैवाने ही घटना घडली. मात्र त्यात डॉक्टरांचा काही दोष नाही.

- डॉ. प्रशांत बोरोले, ऑर्किड हॉस्पिटल

कोट.....

मेहुण्याची तब्येत अतिशय ठणठणीत झालेली होती. दुपारी अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी नसल्याने त्याच वेळेस त्यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा कमी झाला की काय माहिती नाही, मात्र त्यांच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी.

- सुनील विक्रम पवार, मयताचे शालक