शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

४६ कोटींच्या नवीन रस्त्यांसाठी निविदेचे काम अंतीम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, शहरातील प्रत्येक भागात नागरिकांकडून रस्त्यांच्या समस्यांबाबत ओरड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, शहरातील प्रत्येक भागात नागरिकांकडून रस्त्यांच्या समस्यांबाबत ओरड सुरु आहे. तसेच विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता नवीन रस्त्यांच्या कामासाठी तयारी सुरु केली आहे. मनपा फंडातून ४६ कोटींची तरतूद केली आहे. तसेच महासभेची परवानगी घेवून निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात निविदा प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती मनपा बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अरविंद भोसले यांनी ‘लोकमत’ ला दिली.

शहरात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून शहरात नवीन रस्त्यांचा कामाला ब्रेक लागला आहे. त्यात मनपाकडून रस्त्यांची दुरुस्ती देखील थांबली असल्याने रस्त्यांची समस्या अधिकच बिकट होत आहे. शहरात धुळ, खड्डे यामुळे नागरिक त्रासले असून, लोकप्रतिनिधींना आता धारेवर धरले जात आहे. ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमात देखील उपमहापौरांसह सत्ताधाऱ्यांना नागरिक धारेवर धरत आहेत. तसेच रविवारी झालेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात देखील नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना रस्त्याच्या समस्यांवरुन धारेवर धरले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांनी ज्या भागात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. तसेच भुयारी गटार याजनेचे काम पुढील टप्प्यात आहे. अशा भागाचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

१०० कोटींसाठी सत्ताधारी न्यायालयात तर विरोधक मंत्रालयात

१. शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभरात मनपातील सत्ताधाऱ्यांना या निधीचे नियोजन देखील करता आले नव्हते. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर विद्यमान शासनाने स्थगिती आणली आहे.

२. निधी थांबल्याने शहरातील रस्त्यांचे काम देखील थांबले आहे. आता या निधीसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून देखील पाठपुरावा सुरु झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी या निधीवरील स्थगिती उठावी म्हणून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासाठी महासभेत ठराव देखील करण्यात आला आहे. तर विरोधकांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून १०० कोटींच्या निधीवर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.

३. ही स्थगिती उठविण्यासाठी नवीन कामांचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेत्यांनी दिली होती. आता या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, या स्पर्धेत शहरातील प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.