शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

४६ कोटींच्या नवीन रस्त्यांसाठी निविदेचे काम अंतीम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, शहरातील प्रत्येक भागात नागरिकांकडून रस्त्यांच्या समस्यांबाबत ओरड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, शहरातील प्रत्येक भागात नागरिकांकडून रस्त्यांच्या समस्यांबाबत ओरड सुरु आहे. तसेच विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता नवीन रस्त्यांच्या कामासाठी तयारी सुरु केली आहे. मनपा फंडातून ४६ कोटींची तरतूद केली आहे. तसेच महासभेची परवानगी घेवून निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात निविदा प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती मनपा बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अरविंद भोसले यांनी ‘लोकमत’ ला दिली.

शहरात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून शहरात नवीन रस्त्यांचा कामाला ब्रेक लागला आहे. त्यात मनपाकडून रस्त्यांची दुरुस्ती देखील थांबली असल्याने रस्त्यांची समस्या अधिकच बिकट होत आहे. शहरात धुळ, खड्डे यामुळे नागरिक त्रासले असून, लोकप्रतिनिधींना आता धारेवर धरले जात आहे. ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमात देखील उपमहापौरांसह सत्ताधाऱ्यांना नागरिक धारेवर धरत आहेत. तसेच रविवारी झालेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात देखील नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना रस्त्याच्या समस्यांवरुन धारेवर धरले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांनी ज्या भागात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. तसेच भुयारी गटार याजनेचे काम पुढील टप्प्यात आहे. अशा भागाचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

१०० कोटींसाठी सत्ताधारी न्यायालयात तर विरोधक मंत्रालयात

१. शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभरात मनपातील सत्ताधाऱ्यांना या निधीचे नियोजन देखील करता आले नव्हते. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर विद्यमान शासनाने स्थगिती आणली आहे.

२. निधी थांबल्याने शहरातील रस्त्यांचे काम देखील थांबले आहे. आता या निधीसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून देखील पाठपुरावा सुरु झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी या निधीवरील स्थगिती उठावी म्हणून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासाठी महासभेत ठराव देखील करण्यात आला आहे. तर विरोधकांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून १०० कोटींच्या निधीवर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.

३. ही स्थगिती उठविण्यासाठी नवीन कामांचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेत्यांनी दिली होती. आता या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, या स्पर्धेत शहरातील प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.