शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

त्या ७० कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांची ३१ मार्चपर्यंत निघणार निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. बिकट होत जात असलेल्या या समस्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. बिकट होत जात असलेल्या या समस्या बद्दल आता नागरिक रस्त्यांवर उतरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू लागले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी आता नवीन रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला असून, या निधीतून होणाऱ्या कामांसाठी ३१ मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंत अडीच वर्षाचा कार्यकाळात सत्ताधाऱ्यांकडून केवळ मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली असून, एकही ठोस काम सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. त्यात रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून प्रत्येक जळगावकरांना या रस्त्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या धुळीच्या समस्येवर आता नागरिकांचा संताप देखील रस्त्यांवर येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांना पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. गुरुवारी शासकीय सुट्टी असताना देखील महापालिकेच्या अभियंत्यांनी ७० कोटी रुपयांमधून होणार्‍या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू ठेवले होते. ३१ मार्चपर्यंत कामाचे अंदाजपत्रक तयार करून यासाठीची निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेची बांधकाम विभागातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.

मुख्य रस्त्यांसह कॉलनी भागातील रस्त्यांचा समावेश

अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे ९० टक्के तर भुयारी गटार योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता सत्ताधाऱ्यांना खराब रस्त्यांच्या समस्या साठी अमृत योजनेचे कारण पुढे करता येणार नाही. यामुळे राज्य शासनाकडून कोणतेही निधीची वाट न पाहता मनपा फंडातून लवकरात लवकर कामे सुरू करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी तयारी सुरू केली आहे. ७० कोटींच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यासह कॉलनी भागातील रस्त्यांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे.

आता केलेली घोषणा केवळ घोषणाच ठरू नये

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून शहरातील रस्त्यांचा समस्यांबाबत अनेक वेळा कोट्यवधींची घोषणा केली आहे. त्यातून एकही रस्त्याचे काम सत्ताधाऱ्यांना आतापर्यंत करता आलेले नाही. सप्टेंबर महिन्यात मनपा फंडातून ३० कोटींच्या निधीचा ठराव करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने तयार केल्यानंतर हा ठराव सत्ताधाऱ्यांनी रद्द केला. तसेच पुन्हा त्यात १५ कोटींचे वाढ करून ४५ कोटींचे ठराव केला. हा ठराव देखील रद्द करून आता पुन्हा ७० कोटींच्या निधीतून होणार्‍या कामांचा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला आहे. आता महापालिकेने यासाठी अंदाज पत्र तयार करण्याचे काम सुरू केले असले, तरी नगरसेवक पुन्हा त्यात बदल करतील व पुन्हा हे काम रखडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने जरी पावसाळ्यापूर्वीच कामे सुरू करण्याची तयारी सुरू केली असली तरीही यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे खोडा घालण्यात येऊ नये अशी अपेक्षा जळगावकरांना आहे.

मनपा फंडातून कामे असल्याने निविदांना प्रतिसाद मिळणे कठीण ?

महापालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच ७० कोटींची होणारी कामे ही मनपा फंडातून होत असल्याने, या कामांसाठी मनपा निधी कोठून उभी करणार हा देखील प्रश्न आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने ७० कोटींचा रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली तरीही या निविदांना कंत्राटदारांकडून कसा प्रतिसाद मिळेल याकडे लक्ष लागले आहे. मध्यंतरी महापालिकेने काढलेल्या नऊ कोटींचा रस्ते दुरुस्तीच्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. महापौरांनी याबाबत कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना महापालिकेकडून तात्काळ बिलं उपलब्ध होऊन जातील असे आश्वासन दिल्यानंतर या निविदांना प्रतिसाद मिळाला होता.