शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

‘अनलॉक’ च्या दहा महिन्यानंतरही विविध क्षेत्रात ‘लॉक’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली लाॅकडाऊनची प्रक्रिया विविध निर्बंध टाकत अजूनही सुरूच आहे. २३ मार्च ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली लाॅकडाऊनची प्रक्रिया विविध निर्बंध टाकत अजूनही सुरूच आहे. २३ मार्च २०२० पासून करण्यात आलेले लाॅकडाऊन मे महिन्यात काहीसे शिथिल झाले खरे मात्र दहा महिन्यानंतरही विविध क्षेत्रात लॉकडाऊन कायम आहे. यात मध्यंतरी काही दिवस सुरू झालेले चित्रपटगृह, शाळा, महाविद्यालय, आठवडे बाजार, हॉटेल बंदच आहे.

२३ मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यासह जीवनावश्यक वस्तू व आता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले होते. या आदेशाला २३ मार्च २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभराच्या या काळात अजूनही पूर्णपणे अनलॉक झालेलेच नाही. मध्यंतरी शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे, हॉटेल हे सर्व सुरू झाले मात्र कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने हे संपूर्ण व्यवहार व आठवडे बाजार देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी गेल्या वर्षीच्या सारखी स्थिती पुन्हा आता उद्भवत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर ५ मे पासून त्यातील शिथिलता देण्यास सुरुवात झाली. यामध्ये मॉल व हॉटेल वगळता तसेच व्यापारी संकुल सोडून इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी काहीशी रुळावर येऊ लागली.

लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने एकल दुकान असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला. मात्र जळगाव शहरातील संकुल असलेले फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतर संकुल बंदच होते. ५ मे पासून शहरातील एकल दुकाने सुरू झाली व १० मे पासून पुन्हा बंद झाली होती. त्यामुळे पुन्हा एक महिन्यानंतर जून महिन्यात दुकाने सुरू झाली.

शहर व जिल्ह्यात ३ जूनपासून तीन टप्प्यात लॉकडाऊन शिथिल झाले.

पहिल्या टप्प्यात सर्व बाजार, दुकाने, सार्वजनिक मैदाने खुली झाली मात्र मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले बंदच होती. बाजार व दुकाने सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित झोनमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवले. मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंदच राहणार होती. सायकलिंग, धावणे, चालणे, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली. ८ जूनपासून सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार १० टक्केपर्यंत कर्मचाऱ्यांसह सुरू झाली आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करण्यास मुभा देण्यात आली.

पुन्हा लॉकडाऊन

विविध व्यवहारांना शिथिलता देत असताना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने जळगाव शहरात ७ जुलै पासून कडक लाॅकडाऊन करण्यात आले. सात दिवसांच्या या लाॅकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना देखील बंद ठेवण्यात आल्या. यात केवळ दूध व औषधी दुकाने सुरू होते. त्यानंतर जिल्ह्यात नगरपालिका मार्फत जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला.

अखेर व्यापारी संकुल सुरू

शहरातील विविध व्यवहार सुरू होत असताना व्यापारी संकुल मात्र बंद होते. यासाठी व्यापाऱ्यांनी जिल्ह्यासह राज्यस्तरावर पाठपुरावा केला. मात्र त्यांना तब्बल पाच महिने व्यापारी संकुल सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. यामध्ये ५ ऑगस्टपासून ही व्यापारी संकुले सुरू झाली व फुले मार्केट, गोलाणी मार्केट सह सर्वत्र बाजारपेठ गजबजली.

सप्टेंबर नंतर रुग्णसंख्या घटली मात्र निष्काळजीपणा वाढला

जिल्ह्यात रुग्ण संख्या हळूहळू घटत जाऊन सर्वांना दिलासा मिळाला. सप्टेंबर पासून तर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. मात्र या काळात लग्न, निवडणुका, बाजारपेठेतील गर्दी व सार्वजनिक कार्यक्रमासह राजकीय मेळावे यामुळे गर्दी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत गेला व फेब्रुवारीच्या मध्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येऊ लागले.

कारवाईचा धडाका

गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लग्न सोहळा असो की मंगल कार्यालय या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू केला. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या नियंत्रणात येत नसल्याने अखेर १२ ते १४ मार्च दरम्यान महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. इतकेच नव्हे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अजूनही पुढील आदेशापर्यंत अनेक निर्बंध असल्याने शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे, हॉटेल, आठवडे बाजार हे कधी सुरू होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.