शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पाण्याअभावी पिके संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

स्टार १०४८ विजकुमार सैतवाल जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार ...

स्टार १०४८

विजकुमार सैतवाल

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार पेरणीही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून पेरणीसाठी केलेली हातउसनवारी कशी फेडावी, अशी चिंता बळीराजापुुढे उभी राहिली आहे. यात जलसाठ्यांमध्येही वाढ होत नसल्याने जिल्हाभर चिंतेचे वातावरण आहे.

सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र धरणगाव, अमळनेर व चोपडा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्के कमी पाऊस आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोपडा, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे.

पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा हेक्टर्समध्ये)

१) कापूस- १००

२) उडीद - १५०

३) मूग - १५०

४) मका - १२५

५) सोयाबीन - २००

पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

लघु प्रकल्प - ९.९० टक्के

मध्यम प्रकल्प - ४५.१३ टक्के

मोठे प्रकल्प - ४०.२७ टक्के

उसनवारी कशी फेडणार?

शेतकऱ्यांचा नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मुगाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, तसेच आगामी काही दिवस पाऊस न झाल्यास उडीद व मुगामधील दाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिके हातची जात असून उसनवारी कशी फेडावी अशी चिंता आहे.

- विठ्ठल पाटील, शेतकरी.

पावसाअभावी पिके संकटात सापडली असून सोयाबीनचे पिक जवळपास नष्ट झाले आहे. कापूस, मका हे पिकदेखील धोक्यात आले असून ती कशी टिकवावी, अशी चिंता आहे. शिवाय जलसाठ्यांमध्येदेखील पाणी वाढत नसल्याने रब्बी हंगामाचादेखील प्रश्न आहे.

- विजय पाटील, शेतकरी.

गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने नुकसान तर होणार आहे. प्रत्येक पिकाचे नुकसान हे जमिनीच्या प्रतवारीवर अवलंबून असते. त्यामुळे एकूण किती नुकसान होऊ शकते, याचा अंदाज आता येणे शक्य नाही.

- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.