शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पाण्याअभावी पिके संकटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

स्टार १०४८ विजकुमार सैतवाल जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार ...

स्टार १०४८

विजकुमार सैतवाल

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार पेरणीही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून पेरणीसाठी केलेली हातउसनवारी कशी फेडावी, अशी चिंता बळीराजापुुढे उभी राहिली आहे. यात जलसाठ्यांमध्येही वाढ होत नसल्याने जिल्हाभर चिंतेचे वातावरण आहे.

सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र धरणगाव, अमळनेर व चोपडा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्के कमी पाऊस आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोपडा, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे.

पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा हेक्टर्समध्ये)

१) कापूस- १००

२) उडीद - १५०

३) मूग - १५०

४) मका - १२५

५) सोयाबीन - २००

पाणीसाठा ३६ टक्क्यांवर

लघु प्रकल्प - ९.९० टक्के

मध्यम प्रकल्प - ४५.१३ टक्के

मोठे प्रकल्प - ४०.२७ टक्के

उसनवारी कशी फेडणार?

शेतकऱ्यांचा नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मुगाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, तसेच आगामी काही दिवस पाऊस न झाल्यास उडीद व मुगामधील दाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिके हातची जात असून उसनवारी कशी फेडावी अशी चिंता आहे.

- विठ्ठल पाटील, शेतकरी.

पावसाअभावी पिके संकटात सापडली असून सोयाबीनचे पिक जवळपास नष्ट झाले आहे. कापूस, मका हे पिकदेखील धोक्यात आले असून ती कशी टिकवावी, अशी चिंता आहे. शिवाय जलसाठ्यांमध्येदेखील पाणी वाढत नसल्याने रब्बी हंगामाचादेखील प्रश्न आहे.

- विजय पाटील, शेतकरी.

गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने नुकसान तर होणार आहे. प्रत्येक पिकाचे नुकसान हे जमिनीच्या प्रतवारीवर अवलंबून असते. त्यामुळे एकूण किती नुकसान होऊ शकते, याचा अंदाज आता येणे शक्य नाही.

- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.