शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:19 IST

जुलै उजाडला तरी पावसाची प्रतीक्षा : पेरण्या खोळंबल्या (डमी ८८२) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात ...

जुलै उजाडला तरी पावसाची प्रतीक्षा : पेरण्या खोळंबल्या

(डमी ८८२)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जुलैपर्यंत तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसून येत नाही. कारण जुलै महिना उजाळला असतानादेखील पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. त्यात जिल्ह्यात ३० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाअभावी निम्मे क्षेत्रावर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

जून महिन्यात जरी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरी जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये जून महिन्याचा सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे. तर इतर ठिकाणी देखील अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्हाभरात पेरण्या खोळंबल्या आहेत. सद्य:स्थितीत केवळ ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही २० टक्के क्षेत्र हे बागायती कापसाचे आहे. तर उर्वरित १० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू जमिनीवरचे आहे. ज्या भागात सोयाबीनची पेरणी लवकर झाली होती. अशा भागात सोयाबीनचे पीक पूर्णपणे जळून गेले आहे. काही शेतकऱ्यांनी इतरांकडून पाणी घेऊन पिके जगवण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक शेतकऱ्यांना यावर्षी दुबार पेरणी करावी लागणार आहे. उडीद व मूग अजूनही तग धरून असले तरी येत्या तीन-चार दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास उडीद-मूग लागवड केलेल्या शेतकऱ्यांवरदेखील दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

तर दुबार पेरणी अटळ

जिल्ह्यात २५ जूननंतर समाधानकारक म्हणता येईल असाही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जून महिन्याचा सरासरीपेक्षाही १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. लवकर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. सद्य:स्थितीत मान्सूनला ब्रेक लागला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार १० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, १० जुलैनंतर पाऊस सक्रिय न झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगाम लांबून, दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होणार आहे.

बाजरीचा पेरा वाढणार

जिल्ह्यात दरवर्षी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होत असते, मात्र यावर्षी सोयाबीन, मूग व उडीद या पिकांना कमी झालेल्या पावसामुळे फटका बसणार असल्याने जिल्ह्यात यंदा बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून यंदा २०० क्विंटल बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. कमी कालावधीत येणारे पीक असून, चाऱ्यासाठीदेखील याचा वापर होतो. दरम्यान, सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट होण्याची शक्यता आहे.

चोपडा, अमळनेर तालुक्यात कमी पाऊस

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात सरासरीच्या १५ टक्के पाऊस कमी झाला आहे. रावेर, यावलसह पाचोरा, तालुक्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी चोपडा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात यावर्षी जून महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा तब्बल ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यात ३० जूनपर्यंत केवळ १२ ते १५ टक्केच पाऊस झाला आहे. तसेच पाऊस लांबला तर पेरण्यादेखील लांबतील, त्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोट...

जिल्ह्यात काही ठरावीक तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये बरा पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून, पाऊस लांबल्यास झालेल्या पेरण्याही वाया जाण्याची भीती आहे. कृषी विभागाकडून दुबार पेरणीसाठीदेखील बियाणे उपलब्ध आहे. मात्र, ती वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी आशा आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक,

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

गेल्या वर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. जुलैपर्यंत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येईल, अशी आशा होती. मात्र, नंतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. तर यावर्षी देखील सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. आता सर्व निसर्गावर अवलंबून आहे.

-कैलास जाधव, शेतकरी, फुपनगरी

बियाण्यांचे दर वाढलेले असताना, बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पावसाअभावी पीक पुन्हा वाया गेले आहे. आता पुन्हा बियाणे घ्यावे लागणार आहे. आता जे पण उत्पन्न येईल त्यात झालेले नुकसान भरून निघाले तरी चालेल. मात्र, पुन्हा निसर्गाने पाठ फिरविली तर मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळणार आहे.

-रमेश पाटील, शेतकरी, निरूळ,