शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षक करताहेत शेती व रंगकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:05 IST

विनाअनुदानितांना काम नाही, दाम नाही : मिळेत ते काम करण्याची आली वेळ

चोपडा : मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान माजविले असल्याने जिल्हा नव्हे तर राज्य आणि देशभरातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने बहुतांश कंपन्या, औद्योगिक क्षेत्रात नोकरीला असलेले व विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे गावापासून लांब असलेले सर्वच गावात परतलेले आहेत. मात्र गावात त्यांना उपजीविका चालविण्यासाठी विविध व्यवसाय करावे लागत आहेत.बरेच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक हे कोणी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे, तर कोणी रंगकाम, पेंटिंग चा व्यवसाय करीत आहे, तर कोणी युट्युब वर व्हिडिओ बनवून त्याला लाईक मिळवून मानधन मिळवण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. तर काही शिक्षक हे शेती कामाला जाऊ लागले आहेत.जे शिक्षक बाहेर गावी विनाअनुदानित शाळेत होते परंतु गावावर त्यांची शेती होती असे शिक्षक शेतात जाऊन शेती करीत आहेत. यासह इतर वाटेल ते काम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक करीत आहेत.शाळा कधी सुरू होतील हे अजूनही अधांतरीत असल्याने या शिक्षकांना शाळा सुरू होईल आणि आपणास पुन्हा कामावर गेल्यानंतर उपजिविकेसाठी काही अंशी मानधन मिळेल अशी आशा सध्यातरी नाहीये. म्हणून बऱ्याच शिक्षकांनी विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत. या महामारीच्या कोरोनाव्हायरस संसर्गाच्या आजारामुळे सर्वच लोकांना अभूतपूर्व असे अनुभव आल्याने जीवनाचे मूल्य शिकायला मिळाले असल्याने प्रत्येक जण त्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काम करीत आहेत. त्याप्रमाणे शिक्षकही काम करीत आहेत. तर शिक्षक स्वत: घरात फळ्याचा उपयोग करून क्लासेस घेऊन यूटयूबवर टाकत असल्याने जास्त लाईक मिळाल्यास तिकडून मानधन मिळविण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना केंद्रस्थानी घेऊन संबंधित शाळांना अनुदान देण्याचे काम करावे. हात मजूर किंवा ज्यांना कामच नाही, अशा कामगारांना शासनाने मोफत रेशन द्वारा धान्य उपलब्ध करून दिले. त्या स्वरुपात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना काहीच मिळत नसल्याने खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ वेतन मिळावे यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक राकेश विसपुते यांनी केली आहे.