शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिक्षक करताहेत शेती व रंगकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:05 IST

विनाअनुदानितांना काम नाही, दाम नाही : मिळेत ते काम करण्याची आली वेळ

चोपडा : मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान माजविले असल्याने जिल्हा नव्हे तर राज्य आणि देशभरातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने बहुतांश कंपन्या, औद्योगिक क्षेत्रात नोकरीला असलेले व विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे गावापासून लांब असलेले सर्वच गावात परतलेले आहेत. मात्र गावात त्यांना उपजीविका चालविण्यासाठी विविध व्यवसाय करावे लागत आहेत.बरेच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक हे कोणी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे, तर कोणी रंगकाम, पेंटिंग चा व्यवसाय करीत आहे, तर कोणी युट्युब वर व्हिडिओ बनवून त्याला लाईक मिळवून मानधन मिळवण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. तर काही शिक्षक हे शेती कामाला जाऊ लागले आहेत.जे शिक्षक बाहेर गावी विनाअनुदानित शाळेत होते परंतु गावावर त्यांची शेती होती असे शिक्षक शेतात जाऊन शेती करीत आहेत. यासह इतर वाटेल ते काम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक करीत आहेत.शाळा कधी सुरू होतील हे अजूनही अधांतरीत असल्याने या शिक्षकांना शाळा सुरू होईल आणि आपणास पुन्हा कामावर गेल्यानंतर उपजिविकेसाठी काही अंशी मानधन मिळेल अशी आशा सध्यातरी नाहीये. म्हणून बऱ्याच शिक्षकांनी विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत. या महामारीच्या कोरोनाव्हायरस संसर्गाच्या आजारामुळे सर्वच लोकांना अभूतपूर्व असे अनुभव आल्याने जीवनाचे मूल्य शिकायला मिळाले असल्याने प्रत्येक जण त्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काम करीत आहेत. त्याप्रमाणे शिक्षकही काम करीत आहेत. तर शिक्षक स्वत: घरात फळ्याचा उपयोग करून क्लासेस घेऊन यूटयूबवर टाकत असल्याने जास्त लाईक मिळाल्यास तिकडून मानधन मिळविण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना केंद्रस्थानी घेऊन संबंधित शाळांना अनुदान देण्याचे काम करावे. हात मजूर किंवा ज्यांना कामच नाही, अशा कामगारांना शासनाने मोफत रेशन द्वारा धान्य उपलब्ध करून दिले. त्या स्वरुपात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना काहीच मिळत नसल्याने खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ वेतन मिळावे यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक राकेश विसपुते यांनी केली आहे.