शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची होतेय दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय परिसर गजबजू लागला ...

जळगाव : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय परिसर गजबजू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत संपूर्ण नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या २ हजार ५६ शाळा असून त्यामध्ये ३ लाख ३४ हजार ८५२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांनंतर २७ जानेवारीला इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या़ पहिल्या दिवशी जिल्हाभरातील ८२ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन सर्व शाळांमध्ये केले गेले. आजही विद्यार्थ्यांची तपासणी, सोशल डिस्टन्सिंग पालन, परिसर स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, तोंडावर मास्क आदी सर्व बाबींचे तंतोतंत पालन शाळा व्यवस्थापन करीत आहे. त्याचबरोबर शाळा सुरू झाल्याचा आनंदसुद्धा चेहऱ्यावर दिसून येत आहे. परंतु, असे असतानासुद्धा पाचवी ते सहावीचे विद्यार्थी सांभाळताना शिक्षकांची दमछाक होत आहे. वर्गातून शिक्षक तासिका घेऊन नजरेआड होताच एक दुसऱ्याशी बोलणे, खेळणे, एकमेकांच्या बाकावर बसणे, तोंडावरून मास्क काढणे याबाबी आता वर्गात होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांनी कितीही सांगितले तरी ते तेवढ्यापुरते ऐकत असल्याने आता पाचवी ते सहावीचे विद्यार्थी सांभाळण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे जाणवत असले तरी ग्रामीण भागात पालकांमध्ये अजूनही मनात भीती आहे. काही पालक संमतीपत्र देण्यास तयार नसून शिक्षकांवर जबाबदारी टाकून मोकळे होत आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा अशी अट आहे. मात्र, अनेक दिवसांनंतर मुले शाळेत आल्याने शिक्षक वर्गाबाहेर गेले तर विद्यार्थी एकत्र जमा होतात.

- विजय बागुल, पदवीधर शिक्षक

------------

शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत का? मास्क लावला आहे का? याकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र, शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो़ विद्यार्थीसुध्दा स्वत:ची काळजी घेतात.

- राजीव वानखेडे, पदवीधर शिक्षक

------------

पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळच तपासणी केली जाते. हात सॅनिटाईझ करून व तापमान मोजून वर्गात प्रवेश दिला जातो. जेवणाचा डबा आणण्यास मनाई केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खबरदारी घेतली जाते. काही प्रमाणात दमछाक होते.

- मानव भालेराव

००००००००००००००

- जिल्ह्यातून एकूण शाळा

२०५८

- जिल्ह्यातील पाचवी ते आठवी एकूण विद्यार्थी

३ लाख ३४ हजार ८५२

- एकूण शिक्षक

११ हजार ९७९