शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची होतेय दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

जळगाव : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय परिसर गजबजू लागला ...

जळगाव : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शालेय परिसर गजबजू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत संपूर्ण नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या २ हजार ५६ शाळा असून त्यामध्ये ३ लाख ३४ हजार ८५२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांनंतर २७ जानेवारीला इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या़ पहिल्या दिवशी जिल्हाभरातील ८२ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. पहिल्या दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन सर्व शाळांमध्ये केले गेले. आजही विद्यार्थ्यांची तपासणी, सोशल डिस्टन्सिंग पालन, परिसर स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, तोंडावर मास्क आदी सर्व बाबींचे तंतोतंत पालन शाळा व्यवस्थापन करीत आहे. त्याचबरोबर शाळा सुरू झाल्याचा आनंदसुद्धा चेहऱ्यावर दिसून येत आहे. परंतु, असे असतानासुद्धा पाचवी ते सहावीचे विद्यार्थी सांभाळताना शिक्षकांची दमछाक होत आहे. वर्गातून शिक्षक तासिका घेऊन नजरेआड होताच एक दुसऱ्याशी बोलणे, खेळणे, एकमेकांच्या बाकावर बसणे, तोंडावरून मास्क काढणे याबाबी आता वर्गात होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांनी कितीही सांगितले तरी ते तेवढ्यापुरते ऐकत असल्याने आता पाचवी ते सहावीचे विद्यार्थी सांभाळण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे जाणवत असले तरी ग्रामीण भागात पालकांमध्ये अजूनही मनात भीती आहे. काही पालक संमतीपत्र देण्यास तयार नसून शिक्षकांवर जबाबदारी टाकून मोकळे होत आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी असावा अशी अट आहे. मात्र, अनेक दिवसांनंतर मुले शाळेत आल्याने शिक्षक वर्गाबाहेर गेले तर विद्यार्थी एकत्र जमा होतात.

- विजय बागुल, पदवीधर शिक्षक

------------

शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत का? मास्क लावला आहे का? याकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र, शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो़ विद्यार्थीसुध्दा स्वत:ची काळजी घेतात.

- राजीव वानखेडे, पदवीधर शिक्षक

------------

पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळच तपासणी केली जाते. हात सॅनिटाईझ करून व तापमान मोजून वर्गात प्रवेश दिला जातो. जेवणाचा डबा आणण्यास मनाई केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची खबरदारी घेतली जाते. काही प्रमाणात दमछाक होते.

- मानव भालेराव

००००००००००००००

- जिल्ह्यातून एकूण शाळा

२०५८

- जिल्ह्यातील पाचवी ते आठवी एकूण विद्यार्थी

३ लाख ३४ हजार ८५२

- एकूण शिक्षक

११ हजार ९७९