शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

तापी, पांझरा, बोरी, चिखली व माळण नदीजोड प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 18:46 IST

अमळनेर मतदारसंघात नेहमी भेडसावणारा पाण्याचा प्रश्न नदीजोड प्रकल्पामुळे सुटण्यास मदत होणार असून यासाठी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील नदी जोड प्रकल्पाचा आराखडा तयारहायड्रोलीक पंपाद्वारे लहान नद्यांमधील पाणी वळविणार

लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.16 : अमळनेर मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले असून तापी, बोरी, पांझरा, माळण व चिखली या नद्यांवर नदीजोड प्रकल्प राबविण्याची योजना हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून तयार करून मुख्यमंत्री व प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. या संकल्पनेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागास शिफारस केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने 23 ऑगस्ट 2017 रोजी जळगाव जिल्हा नदीजोड प्रकल्पाच्या धोरणाबाबत तसेच त्याचा जिल्हा वार्षिक योजनेत समावेश करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. अमळनेर परिसर हा सतत अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने अनेक गावांना सतत पाणीटंचाई असते. यामुळे याच शासन निर्णयाचा आधार घेऊन हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांनी मतदारसंघात विविध नद्या असल्याने त्या हायड्रोलीक रॅम्प पंपद्वारे उपनद्या, बंधारे व पाटचा:यांशी जोडण्याची कल्पना मांडली होती. व त्या अनुषंगाने तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष नद्यांची पाहणी व तांत्रिक माहिती घेत योजनेचा आराखडा तयार केला होता. तर आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे प्रधान सचिव यांना लेखी निवेदन सादर करून हा प्रकल्प राबविणे किती महत्वाचे आहे हे निदर्शनास आणून दिले. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत शिफारस केली यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्वरित पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. या आहेत प्रकल्पनिहाय मागण्या तापी : प्रमुख नदी असलेल्या तापी नदीवर पाडळसे येथे धरण अपूर्ण अवस्थेत असल्याने पावसाळा तसेच इतर   येणारे 95 टक्के पाणी वाया जाते. ते पाणी हायड्रोलीक रॅम्प पंप वापरून कडणी, चिखली, बोरी, माळीण, पांझरा या उपनद्यांना व लहान मोठय़ा पाटचा:यांना जोडून टाकावे. माळीण : माळीण नदीलगत रणाईचे व परिसरातील 25 दुष्काळग्रस्त गावे असून या नदीवर निसर्डी, लोटाबाडगी, गोयर अशी छोटी धरणे व सिमेंट बंधारे आहेत . याठिकाणी माळीण नदीचे पाणी आणता येणे शक्य आहे. पांझरा : पांझरा नदीलगत मांडळ व परिसरातील 30 गावात कायमस्वरूपी पाण्याची तरतूद होण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवावा तसेच नदीच्या संपर्कात येणारे 15 ते 20 सिमेंट बंधा:यात पाणी सोडावे. बोरी : बोरी नदीलगत अमळनेर व पारोळा तालुक्यात भोकरबारी, खळेश्वर, धार पाझर तलाव, जामदे पाझर तलाव, टोकर तलाव, व इंधवे वनक्षेत्र तलाव असून या तलाव व धरणात नदीजोड प्रकल्प राबवून बोरी नदीचे पाणी सोडावे तसेच बोरीची चिखली ही उपनदी असून गिरणा धरणांतर्गत दहीगाव बंधा:याचे पाणी हे नाल्याद्वारे चिखली नदीजवळ वाहते हे पाणी चिखली नदीस जोडल्यास मतदार संघांचा 30 टक्के भाग पाण्याखाली येईल, याप्रमाणे मागण्या आमदार चौधरी यांनी करून यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे .