शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तापी, पांझरा, बोरी, चिखली व माळण नदीजोड प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 18:46 IST

अमळनेर मतदारसंघात नेहमी भेडसावणारा पाण्याचा प्रश्न नदीजोड प्रकल्पामुळे सुटण्यास मदत होणार असून यासाठी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील नदी जोड प्रकल्पाचा आराखडा तयारहायड्रोलीक पंपाद्वारे लहान नद्यांमधील पाणी वळविणार

लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.16 : अमळनेर मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले असून तापी, बोरी, पांझरा, माळण व चिखली या नद्यांवर नदीजोड प्रकल्प राबविण्याची योजना हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून तयार करून मुख्यमंत्री व प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. या संकल्पनेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागास शिफारस केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने 23 ऑगस्ट 2017 रोजी जळगाव जिल्हा नदीजोड प्रकल्पाच्या धोरणाबाबत तसेच त्याचा जिल्हा वार्षिक योजनेत समावेश करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. अमळनेर परिसर हा सतत अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने अनेक गावांना सतत पाणीटंचाई असते. यामुळे याच शासन निर्णयाचा आधार घेऊन हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांनी मतदारसंघात विविध नद्या असल्याने त्या हायड्रोलीक रॅम्प पंपद्वारे उपनद्या, बंधारे व पाटचा:यांशी जोडण्याची कल्पना मांडली होती. व त्या अनुषंगाने तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष नद्यांची पाहणी व तांत्रिक माहिती घेत योजनेचा आराखडा तयार केला होता. तर आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे प्रधान सचिव यांना लेखी निवेदन सादर करून हा प्रकल्प राबविणे किती महत्वाचे आहे हे निदर्शनास आणून दिले. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत शिफारस केली यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्वरित पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. या आहेत प्रकल्पनिहाय मागण्या तापी : प्रमुख नदी असलेल्या तापी नदीवर पाडळसे येथे धरण अपूर्ण अवस्थेत असल्याने पावसाळा तसेच इतर   येणारे 95 टक्के पाणी वाया जाते. ते पाणी हायड्रोलीक रॅम्प पंप वापरून कडणी, चिखली, बोरी, माळीण, पांझरा या उपनद्यांना व लहान मोठय़ा पाटचा:यांना जोडून टाकावे. माळीण : माळीण नदीलगत रणाईचे व परिसरातील 25 दुष्काळग्रस्त गावे असून या नदीवर निसर्डी, लोटाबाडगी, गोयर अशी छोटी धरणे व सिमेंट बंधारे आहेत . याठिकाणी माळीण नदीचे पाणी आणता येणे शक्य आहे. पांझरा : पांझरा नदीलगत मांडळ व परिसरातील 30 गावात कायमस्वरूपी पाण्याची तरतूद होण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवावा तसेच नदीच्या संपर्कात येणारे 15 ते 20 सिमेंट बंधा:यात पाणी सोडावे. बोरी : बोरी नदीलगत अमळनेर व पारोळा तालुक्यात भोकरबारी, खळेश्वर, धार पाझर तलाव, जामदे पाझर तलाव, टोकर तलाव, व इंधवे वनक्षेत्र तलाव असून या तलाव व धरणात नदीजोड प्रकल्प राबवून बोरी नदीचे पाणी सोडावे तसेच बोरीची चिखली ही उपनदी असून गिरणा धरणांतर्गत दहीगाव बंधा:याचे पाणी हे नाल्याद्वारे चिखली नदीजवळ वाहते हे पाणी चिखली नदीस जोडल्यास मतदार संघांचा 30 टक्के भाग पाण्याखाली येईल, याप्रमाणे मागण्या आमदार चौधरी यांनी करून यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे .