शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

तांबापुरात दोन गटात धुमश्चक्री

By admin | Updated: July 24, 2016 11:53 IST

क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. २४ -   क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या; तर प्रतिस्पर्धी गटाकडून प्रत्युत्तर म्हणून विटांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दोन्ही गटाच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून अन्य संशयितांची रात्रभर धरपकड सुरु होती.

लहान मुलांच्या भांडणावरुन वाद उफाळलाशिरसोली नाक्याला लागून असलेल्या तांबापुरात शुक्रवारी संध्याकाळी बावरी व गवळी गटात लहान मुलांच्या भांडणावरुन वाद झाला होता. हा वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळून आला. समाधान हटकर (गवळी) याला मारण्यासाठी बावरी गटाकडून दहा ते बारा जण धावून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गवळी गटाचेही दहा ते बारा जण धावून आले. बावरी गटाने तलवारी काढून गवळी गटावर चाल केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गवळी गटाने विटा व दगडांचा मारा सुरु केला. त्यामुळे तांबरापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांवर दगडफेकतांबापुरात दोन गटात वाद झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी कर्मचारी रवाना केले. तर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनीही कमांडो पथक रवाना केले, त्यामुळे संशयितांची पळापळ झाली. धरपकड मोहीमेत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. सहायफ फौजदार रत्नाकर झांबरे, शरद भालेराव, अशरफ शेख, गोविंदा पाटील, परेश जाधव, विजय पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या दिशेनेही दगडफेक झाली. मात्र त्यापासून त्यांनी बचाव केला. यावेळी एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.