शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ

By admin | Updated: October 9, 2014 15:07 IST

महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

चाळीसगाव: १५ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात पिछेहाट केली. आता महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या. निश्‍चितच सर्व प्रश्न सुटतील, अशी ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चाळीसगाव येथे विविध सभांमधून दिली. 
चाळीसगाव येथे वाल्मीक ऋषी जयंतीनिमित्त आज देवकर मळ्यात कोळी समाजाचा विभागीय मेळावा झाला. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वालन अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आदिवासी कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील (कोळी) होते. सुरुवातीस शहा यांना कोळी समाजाची खास ओळख असलेली टोपी देऊन सामजाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. याचवेळी समाजाचे नेते रमेश पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतला.
काँग्रेस सरकारवर टीका करताना शहा म्हणाले की, कृषी तसेच औद्योगिक शिक्षण, सहकारी संस्थेत महाराष्ट्र पुढे होता, परंतु हा विकास दर गत १५ वर्षांत कमी झाला. देशाचे कृषिमंत्री शरद पवार असताना येथे दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत होत्या. आघाडी सरकारने १0१ विविध घोटाळ्यांत ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. 
सभेत विठ्ठलराव म्हस्के, सुमनबाई कोळी, मुकेश सोनवणे, सिंधूबाई शिंदे, शिवशंकर फुले, प्रभाकर सोनवणे, प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर खासदार ए.टी. पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, उन्मेष पाटील, के.बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, वाडीलाल राठोड, कोळी समाज जिल्हाध्यक्ष अण्णा कोळी, अविनाश चौधरी, श्याम जाजू, आनंद खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.