शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ

By admin | Updated: October 9, 2014 15:07 IST

महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

चाळीसगाव: १५ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात पिछेहाट केली. आता महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या. निश्‍चितच सर्व प्रश्न सुटतील, अशी ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चाळीसगाव येथे विविध सभांमधून दिली. 
चाळीसगाव येथे वाल्मीक ऋषी जयंतीनिमित्त आज देवकर मळ्यात कोळी समाजाचा विभागीय मेळावा झाला. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वालन अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आदिवासी कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील (कोळी) होते. सुरुवातीस शहा यांना कोळी समाजाची खास ओळख असलेली टोपी देऊन सामजाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. याचवेळी समाजाचे नेते रमेश पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतला.
काँग्रेस सरकारवर टीका करताना शहा म्हणाले की, कृषी तसेच औद्योगिक शिक्षण, सहकारी संस्थेत महाराष्ट्र पुढे होता, परंतु हा विकास दर गत १५ वर्षांत कमी झाला. देशाचे कृषिमंत्री शरद पवार असताना येथे दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत होत्या. आघाडी सरकारने १0१ विविध घोटाळ्यांत ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. 
सभेत विठ्ठलराव म्हस्के, सुमनबाई कोळी, मुकेश सोनवणे, सिंधूबाई शिंदे, शिवशंकर फुले, प्रभाकर सोनवणे, प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर खासदार ए.टी. पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, उन्मेष पाटील, के.बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, वाडीलाल राठोड, कोळी समाज जिल्हाध्यक्ष अण्णा कोळी, अविनाश चौधरी, श्याम जाजू, आनंद खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.