शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

‘टी’ आकाराच्या पुलाला विद्युत खांबामुळे ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, कामाचा वेग संथगतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, कामाचा वेग संथगतीने आहे. मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाने ‘टी’ आकाराचा पूल मंजूर असताना ‘टी’ आकाराला स्थगिती देऊन ‘एल’ आकाराच्याच पुलाचे काम सुरू केले आहे. ‘टी’ आकारासाठी विद्युत खांब अडथळा ठरत असून, हे खांब हटविण्याचे काम महावितरण करेल की मनपा यामध्येच ते अडकले आहे. या फेऱ्यात अडकले तर उड्डाणपूल मुदतीत पूर्ण होणे कठीण असल्याने ‘टी’ आकाराच्या पुलाला स्थगिती देण्यात आली असून, विद्युत खांबाचा अडथळा दूर झाल्यानंतरच ‘टी’ आकाराचा विचार होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम सुरू असताना पुलालगत व खालच्या बाजूला असलेले महावितरणचे विद्युत खांब हटविले गेले नसल्याने काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पुढील कामाला या खांबामुळे अडथळा ठरत असून, हे खांब हटविण्याचे काम जोपर्यंत लांबणार, तोपर्यंत पुलाचे कामही लांबत जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च इतकी आहे. त्यामुळे आता महावितरणची वाट न पाहता बांधकाम विभागने ‘एल’ आकाराच्या पुलाचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. पूर्वीप्रमाणेच पूल तयार झाला तर त्यावरून वाहतूक सुरू होऊ शकते. त्यानंतर विद्युत खांब काढण्यात आले तर पुढे शिवाजीनगर भागातील अमर चौकपर्यंत आर्म काढता येऊ शकतो, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

ऊर्जा मंत्रालयाकडे प्रस्ताव धूळ खात

१. फेब्रुवारी २०१९ पासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, मार्च २०२१ पर्यंत या कामाची मुदत आहे. मात्र, आतापर्यंत या पुलाचे काम ६० टक्के इतके झाले असून, पुलादरम्यान येणाऱ्या विद्युत खांबामुळे अनेकवेळा हे काम थांबले आहे. तसेच अनेकवेळा कामाला अडथळा निर्माण होत असतो.

२. विद्युत खांब काढण्यासाठीची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली आहे. मात्र, खांब काढण्यासाठी महावितरणकडे निधी नसल्याने हे काम होऊ शकलेले नाही. हा पूल मनपाच्या हद्दीत असल्याने या कामासाठी मनपानेदेखील निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मनपाकडेदेखील अद्याप निधीबाबत कोणतेही उत्तर आलेले नाही.

३. दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, महावितरण व रेल्वेचे अधिकारीदेखील उपस्थित होते. कामाला लागणारा खर्च याबाबतचा अंदाजपत्रक तयार करून, राज्य शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाकडे दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव दोन आठवड्यांपासून मंत्रालयात धूळ खात पडलेला आहे.

‘एल’ आकाराला स्थानिकांची अडचण नाही

पूर्वीप्रमाणे होत असलेल्या पुलाला स्थानिकांची कोणतीही अडचण नसून, ‘टी’ आकाराला स्थानिकांचा विरोध होता. ‘एल’ आकारातील पूल तयार झाला तर या भागातील नागरिकांना कानळदा रस्त्याकडून पुलाचा वापर करता येणार आहे. मात्र, या भागातील इतर नागरिकांच्या सोयीसाठी ब्राह्मणसभेकडून बोगदा तयार करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांची आहे. याबाबत रेल्वेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शिवाजीनगरातील नागरिकांनी दिली.