शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

१ मेपासूनच्या लसीकरणासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

जळगाव : येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत ...

जळगाव : येत्या १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच कार्यवाही करायची आहे, यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी यंत्रणांना दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणातील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस आयएमएचे सचिव डॉ. राधेशाम चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यासाठी कोरोना लसीची उपलब्धता, वितरण व केंद्रांची संख्या, लस उपलब्धता होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड व्यक्तींची संख्या, त्यांचे झालेले लसीकरण, उर्वरित व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी करावयाची जनजागृती, लसीकरण केंद्रावर यंत्रणेला येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या अडचणी, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणासाठी करावयाची नोंदणी आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.

जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे, त्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किटची उपलब्धता यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी येत्या २८ एप्रिलपासून जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेच्या पूर्वतयारीचाही आढावा घेण्यात आला. या मोहिमेत नागरिकांचे सर्वेक्षण करताना यंत्रणेने आवश्यक ती काळजी घेऊन कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. वेळेत निदान, वेळेत उपचार या तत्त्वानुसार सर्वेक्षणावर भर देण्यात यावा.यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध विषयांवर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करुन जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच कमी करण्यात यंत्रणांना यश येईल, असे सांगून नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.