शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

त्या २७ नगरसेवकांवर राहणार अपात्रतेची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांचा बळावर भाजपच्या सत्तेला सुरुंग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - मनपाच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांचा बळावर भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. मात्र, ५७ नगरसेवकांपैकी २७ नगरसेवक फोडले असले तरी भाजपचे दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवक फोडण्यात सेनेला अपयश आले. त्यामुळे भाजप मधून फुटलेल्या २७ नगरसेवकांवर भविष्यात अपात्रतेची टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपने देखील आता फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

सत्ताधारी पक्षातून फुटून नवीन गट तयार करण्यासाठी पक्षातील दोन तृतीयांश नगरसेवक फोडणे गरजेचे असते. मनपात सत्ताधारी भाजपचे एकूण ५७ नगरसेवक असल्याने नवीन गट स्थापन करण्यासाठी शिवसेनेला ३८ नगरसेवक फोडणे आवश्यक होते. त्याच दृष्टीने शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले होते. सुरुवातीला भाजपचे नऊ नगरसेवक शिवसेनेच्या हाती लागल्यानंतर, शिवसेनेकडून महापौरपदाची निवडणुकीसाठी लागणारे बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यात एमआयएम चे तीन नगरसेवक मिळाल्याने व भाजपचे विद्यमान सभागृहनेते ललित कोल्हे हे देखील आपल्या चार समर्थक नगरसेवकांचा शिवसेनेत दाखल झाल्याने, शिवसेनेकडून भाजपचा गट फोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सोमवार पर्यंत भाजपचे एकूण २५ नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सामील झाले होते. भविष्यात फुटलेल्या नगरसेवकांना अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिवसेनेने भाजपचे ३८ नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र निवडणुकीपर्यंत शिवसेनेचे हे प्रयत्न काही अंशी अपूर्ण पडले आहेत. शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली असली तरी भविष्यात फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक नगरसेवकाशी संपर्क करून फोडण्याचा केला प्रयत्न

शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक आपल्या गोटात समाविष्ट करून घेतल्यानंतर, कुठल्या नगरसेवकांवर भविष्यात अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून भाजपच्या इतर नगरसेवकांना देखील आपल्याकडे खेचण्यासाठी सेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. सेनेकडून बुधवारी रात्रीपर्यंत भाजपच्या अनेक नगरसेवकांशी संपर्क करण्यात आले. तसेच स्वतंत्र गटासाठी लागणारी ३८ नगरसेवकांचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेचा अनेक नेत्यांनीही यासाठी प्रयत्न केले. मात्र भाजपचे नगरसेवक नाशिकला रवाना झाल्याने भाजपने देखील गट स्थापन करण्या इतके नगरसेवक फुटू न देण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडे व मनपा आयुक्तांकडे करण्यात येणार तक्रार

भाजपच्या फुटलेला नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत भाजप कडून जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवतील. त्यानंतर विभागीय आयुक्त देखील याबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवण्याची शक्यता आहे. अपात्रतेची कारवाईची प्रक्रिया ही सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक चालण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप न्यायालयात जाण्याचा तयारीत असल्याची माहिती भाजपच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.