शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

आश्चर्य...शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम यांचेही मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या टी व एल आकारावरून शिवाजीनगरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या टी व एल आकारावरून शिवाजीनगरातील नागरिक, नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. हा पूल टी आकारात करण्यात यावा यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ऑनलाइन पद्धतीत अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचे लक्षात आले असून, यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ही मतदान झाल्याची बाब समोर आली आहे.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी ऑनलाइन मतदान प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी समोर आणल्या आहेत. तसेच या प्रक्रियेत कोणतीही विश्वसनीयता नसून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे. ही प्रक्रिया केवळ नावालाच असून, ज्या व्यक्तीकडे ही लिंक जाईल तो व्यक्ती मतदान करू शकतो. मग तो व्यक्ती शिवाजीनगर भागातील असो वा नसो, शहरातील कोणत्याही भागातील नागरिक या पुलाच्या कामाबाबत आपले मत नोंदवू शकतो. यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांच्या मतांची नोंद कशी होऊ शकते. त्यामुळे या ऑनलाइन मतदान प्रक्रियेला कोणताही अर्थ नसल्याचाही दावा गुप्ता यांनी केला आहे. शिवाजीनगरातील नागरिकांची मागणी एल आकाराचा पुलाचीच असून, टी आकाराच्या पुलाला या भागातील नागरिकांचा विरोध असल्याचाही दावा दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे, तर भाजपचे बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे हे मात्र टी आकाराचा पुलासाठी आग्रही आहेत. या मुद्द्यावरून सध्या शिवाजीनगरातील राजकारण पेटलेले आहे. तसेच नागरिकदेखील दोन गटांत विभागले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरदेखील नवा पेच निर्माण झाला आहे.

टी आकाराचा पूल रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

शिवाजीनगरातील काही नागरिकांनी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता, शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने हे काम सुरू ठेवावे. तसेच आराखड्यानुसार हे काम न करता जुन्या पद्धतीने काम करण्याची मागणीदेखील या भागातील नागरिकांनी केली आहे. मात्र भविष्यात या भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी ब्राह्मणसभेत जवळ मंजूर असलेल्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात यावे, अशीही मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.