शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

आश्चर्य...शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम यांचेही मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या टी व एल आकारावरून शिवाजीनगरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या टी व एल आकारावरून शिवाजीनगरातील नागरिक, नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. हा पूल टी आकारात करण्यात यावा यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी ऑनलाइन पद्धतीने नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ऑनलाइन पद्धतीत अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचे लक्षात आले असून, यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ही मतदान झाल्याची बाब समोर आली आहे.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी ऑनलाइन मतदान प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी समोर आणल्या आहेत. तसेच या प्रक्रियेत कोणतीही विश्वसनीयता नसून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे. ही प्रक्रिया केवळ नावालाच असून, ज्या व्यक्तीकडे ही लिंक जाईल तो व्यक्ती मतदान करू शकतो. मग तो व्यक्ती शिवाजीनगर भागातील असो वा नसो, शहरातील कोणत्याही भागातील नागरिक या पुलाच्या कामाबाबत आपले मत नोंदवू शकतो. यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांच्या मतांची नोंद कशी होऊ शकते. त्यामुळे या ऑनलाइन मतदान प्रक्रियेला कोणताही अर्थ नसल्याचाही दावा गुप्ता यांनी केला आहे. शिवाजीनगरातील नागरिकांची मागणी एल आकाराचा पुलाचीच असून, टी आकाराच्या पुलाला या भागातील नागरिकांचा विरोध असल्याचाही दावा दीपक कुमार गुप्ता यांनी केला आहे, तर भाजपचे बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे हे मात्र टी आकाराचा पुलासाठी आग्रही आहेत. या मुद्द्यावरून सध्या शिवाजीनगरातील राजकारण पेटलेले आहे. तसेच नागरिकदेखील दोन गटांत विभागले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरदेखील नवा पेच निर्माण झाला आहे.

टी आकाराचा पूल रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

शिवाजीनगरातील काही नागरिकांनी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता, शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने हे काम सुरू ठेवावे. तसेच आराखड्यानुसार हे काम न करता जुन्या पद्धतीने काम करण्याची मागणीदेखील या भागातील नागरिकांनी केली आहे. मात्र भविष्यात या भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी ब्राह्मणसभेत जवळ मंजूर असलेल्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात यावे, अशीही मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.