शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जामनेर तालुक्यातील सूर प्रकल्प कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:04 IST

४५ गावांना टंचाईची भीती

जामनेर : तालुक्यात यंदा आज पर्यंत ८१३ मिमी पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी ११२.७ मिमी आहे. कांग व वाघूर नदीला गेल्या चार महिन्यात पाच ते सहा मोठे पूर गेले. मात्र सूर नदीच्या उगम क्षेत्रात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कापूसवाडी जवळील सूर प्रकल्प अद्याप कोरडाच असून मृत साठ्यात अवघी १० ते २० टक्केच वाढ झाली.सूर नदीचा उगम बुलडाणा जिल्ह्यातील गिरड घाटात होतो. यंदा येथे कमी पाऊस झाल्याने सूर प्रकल्प भरू शकला नाही. सूर नदीवर धामणगाव व सावलतबारा येथे दोन धरणे आहेत. या धरणात साठा झाल्यानंतरच सूर प्रकल्पात पाणी पोहचत. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता.मत्स्य उद्योग संकटातसूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात मासे टाकून वाढविले जातात. यंदा प्रकल्पात पाणीच नसल्याने मत्स्य उद्योग संकटात आला आहे.या प्रकल्पातून कापूसवाडी, बेटावद बुद्रुक, खुर्द, रांजणी, मालदाभाडी, नवी दाभाडी, सोनारी, वाघारी आदी १२ व विदर्भातील १५ गावांना पाणी पुरविले जाते. भविष्यात या गावांना पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. मालदाभाडी येथील स्टार्च प्रकल्पास येथूनच पाणी पुरविले जात होते. सूर प्रकल्पातून १९ किमीचा पाट काढला गेला. मात्र आजपर्यंत एकदाही त्यात पाणी सोडले नाही. पाटावर झालेला कोटींचा खर्च वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.