शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सुनील झंवर माझे मित्र होते, आहेत अन‌् राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : सुनील झंवर हे माझ्या गावाचे आहेत आणि गावाचा माणूस हा मित्रच काय तर तो एक नातेवाइकासारखाच असतो. ...

जळगाव : सुनील झंवर हे माझ्या गावाचे आहेत आणि गावाचा माणूस हा मित्रच काय तर तो एक नातेवाइकासारखाच असतो. अन‌् कोणी कोणाचा मित्र असू नये किंवा असावा हे काय वरून ठरून येत नाही. सुनील झंवर हे माझे मित्र होते, आहेत आणि भविष्यातदेखील राहणार असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यामुळे जिल्ह्याचा राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

बीएचआर प्रकरणी सुनील झंवर याच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांच्यासोबतच्या संबंधाबाबत सर्वच जण इन्कार करत असताना, पालकमंत्र्यांचा या दाव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या नियोजनासाठी शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन लेवा भवन येथे करण्यात आले होते, मेळावा संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, लता सोनवणे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

काळसूत्रीमध्ये काय झाले, यासाठी खुले मैदान

झंवर यांच्याशी संबंधच ठेवू नये हे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या काळात काय झाले , हे त्यांनी बघावे यासाठी खुले मैदान आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सुनील झंवर यांचे माझ्याशीच नाही तर त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याचे सांगितले होते. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता पालकमंत्र्यांनीदेखील झंवर यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध असल्याचे जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांचा मागणीसाठी फडणवीसांनी पुढाकार घ्यावा

कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांचा बाजूने उभे राहू असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, याबाबतदेखील महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. त्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, फडणवीस यांनी केवळ टीका न करता शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पुढाकार घेतला पाहिजे. तेदेखील शेतकऱ्यांचे नेते असून, केवळ टीका करण्यात वेळ वाया न घालता त्यासाठी त्यांनी काम करावे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

माझ्या कार्यालयाच्या दरवाजा कार्यकर्त्यांसाठी उघडा : संजय सावंत

ठरावीक लोकांच्याच गोतावळ्यात राहात असल्याचा आरोप चुकीचा असून, माझ्या कार्यालयाचा दरवाजा कार्यकर्त्यांसाठी नेहमी उघडा असल्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले. शिवसेनेचे नगरसेवकपदाचे उमेदवार असलेला कार्यकर्ता अडचणीत असल्याने त्याची समस्या सोडविण्यासाठी शहरात खास आलो होतो. मात्र, मी ठरावीकांच्याच गोतावळ्यात फिरतो, हा आरोप चुकीचा असल्याचे सावंत म्हणाले.