शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

संडे स्पेशल मुलाखत_ भाजपकडून खच्चीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:41 IST

आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही.

ठळक मुद्देअ‍ॅड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केल्या भावनासंडे स्पेशल मुलाखतआक्रमक आणि डोईजड नेतृत्व भाजपात चालत नाही.

चाळीसगाव : आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही. त्याचे पद्धतशीर खच्चीकरण केले जाते, याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे याच आक्रमकतेचे बळी ठरले आहे. तथापि त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. चाळीसगाव तालुक्याची राजकीय गणितेही बदलतील. राष्ट्रवादीसाठी खडसेंचे पक्षांतर बेरजेचे असेल. मी मात्र काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे मत माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णशी त्यांनी संवाद साधला. १९९०मध्ये एकनाथराव खडसे यांच्यासोबतच आमदार म्हणून निवडून आलेले ॲड. ईश्वर जाधप यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.प्रश्न : एकनाथराव खडसे यांच्यावर भाजप सोडण्याची वेळ का आली?मुक्ताईनगरात स्वत: खडसे आणि चाळीसगाव तालुक्यात मी. आम्ही दोघांनी भाजपाचे निशाण रोवत परिसर पिंजून काढला. खूप आक्रमकता भाजपात चालत नाही. डोईजड होऊ पाहणाऱ्या नेतृत्वाला घेरले जाते. पक्षासाठी खूप काही करुनही एकनाथराव खडसे यांना आक्रमक कार्यपद्धतीमुळे भाजप सोडावा लागला. मी १९९० मध्ये भाजपतर्फे चाळीसगाव मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलो. माझ्या रुपाने भाजपचे तालुक्यात खाते उघडले. माझीही आक्रमकता अडसर ठरली. मला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले गेले. माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील यांचीही कथा अशीच आहे. यात एकनाथराव खडसे हे अजून एक नाव वाढले आहे.प्रश्न : खडसे यांच्या पक्षांतराचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?जाधव : खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. याचा साहजिकच फटका भाजपला बसेल. खडसे आणि भाजपातील कलगीतुराही वाढलेला दिसून येईल. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का देईल. ही राष्ट्रवादीसाठी बेरीज तर भाजपासाठी वजाबाकी असेल. काँग्रेस आणि शिवसेनेलाही संधी मिळेल. एकूणच महाविकास आघाडीला जिल्ह्यात ह्यअच्छे दिनह्णयेतील.प्रश्न : भाजपाने खडसेंबाबत चूक केली असे म्हणायचे का?जाधव : हो निश्चितच. पक्षासाठी अपार कष्ट करणा-या कार्यकर्त्याला, नेतृत्वाला नामोहरम करणे त्याच्यासाठी क्लेशदायीच असते. ते एकनाथराव खडसेंबाबत झाले.प्रश्न: चाळीसगावच्या राजकीय सारीपाटावर काय परिणाम होतील ?२००९ चा अपवाद वगळता प्रत्येक विधानसभेत भाजपने विजयी गुलाल उधळला. त्याचा पाया १९९० मध्ये माझ्या विजयाने रचला गेला. भाजपचा हा बालेकिल्ला एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने काहीसा ढासळेल.प्रश्न : तुम्हीही राष्ट्रवादीत जाणार का?अजिबात नाही. मी काँग्रेसचेच काम करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही. आमची महाविकास आघाडी असल्याने काँग्रेसलाही फायदा होईल.

 

 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव