शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संडे स्पेशल मुलाखत_ भाजपकडून खच्चीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:41 IST

आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही.

ठळक मुद्देअ‍ॅड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केल्या भावनासंडे स्पेशल मुलाखतआक्रमक आणि डोईजड नेतृत्व भाजपात चालत नाही.

चाळीसगाव : आक्रमक आणि डोईजड होणारे नेतृत्व, कार्यकर्ते भाजपात चालत नाही. त्याचे पद्धतशीर खच्चीकरण केले जाते, याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे याच आक्रमकतेचे बळी ठरले आहे. तथापि त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. चाळीसगाव तालुक्याची राजकीय गणितेही बदलतील. राष्ट्रवादीसाठी खडसेंचे पक्षांतर बेरजेचे असेल. मी मात्र काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असे मत माजी आमदार ॲड. ईश्वर जाधव यांनी व्यक्त केले. ह्यलोकमतह्णशी त्यांनी संवाद साधला. १९९०मध्ये एकनाथराव खडसे यांच्यासोबतच आमदार म्हणून निवडून आलेले ॲड. ईश्वर जाधप यांनी ह्यलोकमतह्णशी संवाद साधला.प्रश्न : एकनाथराव खडसे यांच्यावर भाजप सोडण्याची वेळ का आली?मुक्ताईनगरात स्वत: खडसे आणि चाळीसगाव तालुक्यात मी. आम्ही दोघांनी भाजपाचे निशाण रोवत परिसर पिंजून काढला. खूप आक्रमकता भाजपात चालत नाही. डोईजड होऊ पाहणाऱ्या नेतृत्वाला घेरले जाते. पक्षासाठी खूप काही करुनही एकनाथराव खडसे यांना आक्रमक कार्यपद्धतीमुळे भाजप सोडावा लागला. मी १९९० मध्ये भाजपतर्फे चाळीसगाव मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलो. माझ्या रुपाने भाजपचे तालुक्यात खाते उघडले. माझीही आक्रमकता अडसर ठरली. मला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले गेले. माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील यांचीही कथा अशीच आहे. यात एकनाथराव खडसे हे अजून एक नाव वाढले आहे.प्रश्न : खडसे यांच्या पक्षांतराचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?जाधव : खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. याचा साहजिकच फटका भाजपला बसेल. खडसे आणि भाजपातील कलगीतुराही वाढलेला दिसून येईल. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का देईल. ही राष्ट्रवादीसाठी बेरीज तर भाजपासाठी वजाबाकी असेल. काँग्रेस आणि शिवसेनेलाही संधी मिळेल. एकूणच महाविकास आघाडीला जिल्ह्यात ह्यअच्छे दिनह्णयेतील.प्रश्न : भाजपाने खडसेंबाबत चूक केली असे म्हणायचे का?जाधव : हो निश्चितच. पक्षासाठी अपार कष्ट करणा-या कार्यकर्त्याला, नेतृत्वाला नामोहरम करणे त्याच्यासाठी क्लेशदायीच असते. ते एकनाथराव खडसेंबाबत झाले.प्रश्न: चाळीसगावच्या राजकीय सारीपाटावर काय परिणाम होतील ?२००९ चा अपवाद वगळता प्रत्येक विधानसभेत भाजपने विजयी गुलाल उधळला. त्याचा पाया १९९० मध्ये माझ्या विजयाने रचला गेला. भाजपचा हा बालेकिल्ला एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने काहीसा ढासळेल.प्रश्न : तुम्हीही राष्ट्रवादीत जाणार का?अजिबात नाही. मी काँग्रेसचेच काम करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही. आमची महाविकास आघाडी असल्याने काँग्रेसलाही फायदा होईल.

 

 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव