शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

दोन आठवडे आधीच उन्हाळ्याची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या काही वर्षात जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. याचा परिणाम ऋतूंवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या काही वर्षात जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. याचा परिणाम ऋतूंवर देखील पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात सरासरीत वाढ झाली आहे. तर हिवाळ्यात देखील सरासरी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच यंदाचा उन्हाळा देखील दोन आठवडे आधीच दाखल झाला आहे. शहराच्या तापमानात वाढ होत असून पारा ३९ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिकच कडक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पारा वाढायला सुरुवात होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा ३९ ते ४० अंशावर पोहचत असतो, मात्र यंदा फेब्रुवारी महिन्याचा शेवटच्या तर मार्च च्या पहिल्या आठवड्यातच पारा ३८ ते ३९ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच जळगावकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

काय आहे कारण

हवामान बदलाचा परिणाम दिसून येत असून, यंदा बंगाल व अरबी समुद्रात सातत्याने चक्रीवादळ निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले गेले. त्याचा परिणाम थंडीवर झालेला दिसून आला. तसेच तिन्ही महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान , उत्तरेकडून थंड वारे येत असताना फेब्रुवारी महिन्यात ५ विक्षोभ तयार होत असतात, त्यामुळे मार्च महिन्याचा मध्यापर्यंत तापमान सहसा वाढत नाही. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यात केवळ २ विक्षोभ तयार झाले. त्यामुळे तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ झाली असून यंदा मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यातच पारा ३९ अंशावर पोहचला आहे.

हिवाळ्यात किमान तापमानात ३ अंशाची वाढ

यंदा हिवाळ्यात देखील तापमानात घट झाली नव्हती. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी जिल्ह्यात सहसा १३ ते १४ अंश इतकी असते, मात्र यंदा ही सरासरी १७ अंश पर्यंत वाढली आहे. गेल्यावर्षी ही सरासरी १६ अंश इतकी होती. दोन वर्षात ही सरासरी ३ अंशानी वाढली आहे. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे भविष्यात जिल्ह्यातील रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुन्हा अवकाळी चे संकट

यंदा तापमानवाढीसह सातत्याने अवकाळी चे संकट देखील वाढले आहे. जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या हिवाळ्यातील चारही महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यात मार्च महिन्यात देखील पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत असल्याने कमी दाबाचे पट्टे विकसित होऊन हे संकट आता प्रत्येक महिन्यात निर्माण होऊ लागले आहे.

येत्या पाच दिवसाच्या तापमानाचा अंदाज

तारीख कमाल -किमान

३ मार्च - ३८ - १९

४ मार्च - ३९ - १८

५ मार्च - ४० - २०

६ मार्च -३९ - २०

७ मार्च - ३९ - २०

कोट

तापमानात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानात होत असलेले बदल हेच आहे. जागतिक हवामानात बदल होत आहे. त्याचा परिणाम आपल्याकडील ऋतूंवर देखील होत आहे. भविष्यात हे बदल मोठया वेगाने होतील.

-नीलेश गोऱ्हे, हवामान तज्ञ.