शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

जिल्ह्यात 15 महिन्यांत 195 शेतक:यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 11:52 IST

शेतक:यांच्या कजर्माफीची मागणी होत असताना 15 महिन्यात जिल्ह्यातील 195 शेतक:यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे.

 कजर्माफी राहिली दूर, बळीराजाचाच बळी : 109 प्रकरणे अपात्र, मदत कशी मिळणार?

जळगाव,दि.30- राज्यात शेतक:यांना कजर्माफी मिळण्याची मागणी होत असताना कजर्माफी मिळणे तर दूरच देशाचा खरा पोशिंदा असलेल्याचाच बळीराजाचा बळी जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मदतीसाठीचे निम्म्याहून अधिक प्रस्ताव अपात्र ठरत असल्याने मृत्यूनंतरही बळीराजाच्या कुटुंबाची उपेक्षा सुरूच आहे. 
 निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कजर्बाजारीपणा याला कंटाळून जिल्ह्यामध्ये 15 महिन्यात तब्बल 195 शेतक:यांनी आत्महत्या केल्या.  शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे  109 प्रस्ताव अपात्र ठरले आहे तर 26 प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने मृत्यूनंतरही वारसांची वणवण कायम आहे.
 सप्टेंबर महिन्यात जास्त आत्महत्या
वर्षभरातील आत्महत्येची संख्या पाहिली तर सप्टेंबर 2016 या महिन्यात जास्त (27) आत्महत्या झाल्या आहेत. पेरणीसाठी कजर्, बियाणे घेतल्यानंतर काढणीचा हंगाम असलेल्या याच काळात पीक हाती आले नाही तर आत्महत्या होतात, असा एक अंदाज व्यक्त केला जातो. 
 शेतकरी आत्महत्येनंतर वारसांना मदतीची घोषणा करण्यात आली होती. जिल्ह्यातील 195 मदतीच्या प्रस्तावातून या समितीने तब्बल 109 प्रस्ताव अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही या शेतक:यांच्या वारसाची शासनाकडून उपेक्षा कायम आहे.
तीन वर्षात वाढले आत्महत्येचे प्रमाण
गेल्या तीन वर्षापासून दुष्काळीस्थिती आणि अवकाळी पाऊस झाल्याने बळीराजा पार कोलमडला होता. त्यातच तीन वर्षापासून आत्महत्येच्या प्रमाणात जास्त वाढ झाली. 2013 मध्ये 92 शेतक:यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2014 मध्ये त्यात वाढ होऊन हा आकडा 174 र्पयत पोहचला. 2015 मध्ये 136शेतक:यांनी आत्महत्या केली आणि 2016 मध्ये  हा आकडा तब्बल 171 वर पोहचला.   जानेवारी 2017 ते 20 मार्च 2017 या तीन महिन्यात 24 शेतक:यांनी आत्महत्या केल्या. या तीन महिन्यात हा आकडा वाढतच गेला असून जानेवारीमध्ये सहा जणांनी आत्महत्या केल्या त्यानंतर फेब्रुवारी मध्ये सात आणि मार्चमध्ये 11 जणांनी मृत्यूला कवटाळले. 
 
वर्षनिहाय झालेल्या शेतकरी आत्महत्या
वर्षआत्महत्या      मदतीस पात्र    अपात्र
2013     9256      36
2014    17476      98
2015    13616      81  
2016    17158      108
2017      24 2          1 
(29 मार्चर्पयत)