शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नवी दाभाडीतील पीडितेच्या आत्महत्या प्रकरणात कलम वाढविण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST

जळगाव : जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथे मुलीच्या आत्महत्येप्रकरणात ३२५ हे कलम लावलेले नव्हते. ही बाब लक्षात आल्याने या ...

जळगाव : जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी येथे मुलीच्या आत्महत्येप्रकरणात ३२५ हे कलम लावलेले नव्हते. ही बाब लक्षात आल्याने या प्रकरणात हे कलम वाढविण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली. या सोबतच या नवीदाभाडी व मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील प्रकरणांमध्ये पीडित मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य दिल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दोन ठिकाणी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी शुक्रवार, २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर जळगावात पत्रकार परिषद घेत या विषयी माहिती दिली. या वेळी आयोगाच्या सहायक निर्देशक अनुराधा दुसाने, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील आदी उपस्थित होते.

नवीदाभाडी, ता.जामनेर येथील मुलीने गावातील दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित आयोगाने दखल घेतली व शुक्रवारी तेथे आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी भेट दिली. या दरम्यान सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी ३२५ (हाणामारी, जखम करणे) हे कलम लावलेले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणात हे कलम वाढविण्याची सूचना पोलिसांना दिली असल्याची माहिती पारधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अत्याचारग्रस्त पीडितेच्या कुटुंबीयास मदत म्हणून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आठ लाख २५ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून त्या पैकी चार लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश कुटुंबीयांना देण्यात आल्याचेही पारधी यांनी या वेळी सांगितले.

परप्रांतातील मुलीलाही मदत

उचंदा, ता.मुक्ताईनगर येथे मध्यप्रदेशातील युवती मावशीकडे आली असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. तिच्याही कुटुंबियांची पारधी यांनी भेट घेऊन दोन लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे पारधी यांनी सांगितले. या मुलीच्या कुटुंबीयास मदत म्हणून चार लाख रुपये मंजूर केले असून ही मुलगी मध्यप्रदेशातील असली तरी ही घटना आपल्या राज्यात घडल्याने तिलाही मदत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गुन्हेगार सुटू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न आवश्यक

मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी असून अशा घटनांमध्ये पीडित, तिचे कुटुंबीय यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाचा प्रयत्न राहणार असे, पारधी यांनी सांगितले. अशा घटनांमध्ये गुन्हेगार सुटू नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही पारधी यांनी नमूद केले.

कुटुंबाला न्यायाची अपेक्षा

नवीदाभाडी व उचंदा येथील कुटुंबीयांच्या भेटी दरम्यान त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. या सोबतच या कुटुंबीयांनी आम्हाला, न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली असल्याचे पारधी म्हणाले. त्यांच्या मागणीनुसार अशा प्रकरणांमध्ये न्याय देण्यासाठी आयोगाचे प्रयत्न राहणार असल्याचे पारधी म्हणाले.