शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची दमछाक

By admin | Updated: February 27, 2017 01:08 IST

राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.

जळगाव : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवीच्या ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाच्या प्रश्न पत्रिका संच ‘डी’मध्ये प्रश्न क्रमांक ९ ते ११ हे  चुकीचे असल्याचे  समोर आले आहेत. हे तिन्ही प्रश्न परिच्छेद वाचून सोडविण्याचा सूचना प्रश्नपत्रिकेत देण्यात आल्या. मात्र प्रश्नपत्रिकेत संबधित प्रश्नांचा एक ही परिच्छेद नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या. विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेलाराज्य परीक्षा परिषदेतर्फे या वर्षांपासून  इयत्ता ४ थी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील २१३ परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. मात्र इयत्ता पाचवीच्या ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाच्या ‘डी’ प्रश्नपत्रिका संचातील तीन प्रश्नांच्या घोळ मुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. याबाबत मनसेचे माजी महानगरप्रमुख विरेश पाटील व सचिव अविनाश पाटील या जागृत पालकांनी नाराजी व्यक्त केली.काय आहे प्रकारशिष्यवृत्ती परीक्षेसाठी  इयत्ता पाचवीचे दोन पेपर घेण्यात आले. दुपारी १.३० ते ३ वाजेदरम्यान ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाचा  पेपर घेण्यात आला. यामध्ये डी संचात प्रश्न क्रमांक ९ ते ११ या तीन प्रश्नासाठी परिच्छेद वाचून त्यावर आधारीत  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र विचारलेल्या प्रश्नांसंबधीचा परिच्छेद प्रश्न पत्रिकेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविताना अडचणी आल्या. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षकांकडे तक्रारी करण्यात आल्या. चुकांबद्दल कोणतीही तक्रार पालक वर्गाकडून आली नाही.  तक्रार आल्यास संबधित प्रश्नांबाबत महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेला तो अहवाल पाठविला जाईल.  विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. -बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग३२ हजार १६५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षाशिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३३ हजार  ८६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३२ हजार १६५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १ हजार ७०३ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले. इयत्ता पाचवी चे १२४६ तर आठवीचे ४५७ विद्यार्थी गैरहजर राहिले. यंदापासून शिष्यवृती परीक्षेसाठी बहुसंच प्रश्न पत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे देखील विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.