शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:28 IST

जळगाव : तालुक्यातील वडली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ...

जळगाव : तालुक्यातील वडली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. पत्रे सडल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात येते. खिडक्यांची अवस्थाही वाईट झालेली आहे. शौचालय असूनही तेथे पाण्याची व्यवस्था व स्वच्छता नसल्याने ते वापरण्यास अयोग्य आहे. आता तुटलेली पत्रे काढून तीन खोल्यांना नवीन पत्रे लावण्यात आली, थोडक्यात तात्पुरती मलमपट्टी करण्याच आली असली तरी आजार कायमच आहे.

वडली गाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच येते, त्यामुळे तालुक्याचे आमदार, पालकमंत्री व त्याशिवाय जिल्हा नियोजन मंडळाचेही अध्यक्ष पाटीलच असतानाही नवीन शाळा खोल्या मिळालेल्या नाहीत. नवीन काही खोल्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक नितीन धांडे यांनी दिली, परंतु हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश अजाबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून शुध्द पाण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती, मात्र आता ही यंत्रणाही धूळखात पडली आहे. दोन संगणक असूनही ते बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा उपयोगच होत नाही. शौचालय, मुतारी असून नसल्यासारखी आहे. प्रयोगशाळा किंवा संगणक कक्ष नाही. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा भागण्यासाठी ज्याची गरज आहे, त्याचीच येथे कमी आहे. शिक्षक संख्या आठवरून पाचवर आली. अर्थात शासनानेच ही संख्या घटविली. सात वर्गांना पाच शिक्षक अशी स्थिती या शाळेची झाली आहे.

दुरुस्तीवर पैशांची उधळपट्टी

शाळेची दयनीय अवस्था झालेली असताना नवीन पक्क्या शाळा खोल्या देण्याऐवजी जिल्हा परिषदेकडून केवळ दुरुस्तीवरच पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यातून नेमके काय हित साधायचे आहे, हेच कळत नाही. जिल्ह्याचे उन्हाळ्यातील तापमानाची स्थिती पाहता पत्र्याच्या खोल्यांमध्ये बसल्यावर विद्यार्थ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार न केलेलाच बरा.

कोट...

ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. गावात कोणत्या गोष्टीची अपूर्णता आहे. याचा आढावा घेतला जात आहे. गावकऱ्यांच्या प्राथमिक गरजा, शाळेत नवीन खोल्या, शुध्द पाणी, शौचालय आदी विषय तातडीने मार्गी लावले जातील. त्यासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.

-मोनिका वसंत पाटील, उपसरपंच