शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:28 IST

जळगाव : तालुक्यातील वडली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ...

जळगाव : तालुक्यातील वडली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. पत्रे सडल्याने पावसाचे पाणी थेट वर्गात येते. खिडक्यांची अवस्थाही वाईट झालेली आहे. शौचालय असूनही तेथे पाण्याची व्यवस्था व स्वच्छता नसल्याने ते वापरण्यास अयोग्य आहे. आता तुटलेली पत्रे काढून तीन खोल्यांना नवीन पत्रे लावण्यात आली, थोडक्यात तात्पुरती मलमपट्टी करण्याच आली असली तरी आजार कायमच आहे.

वडली गाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच येते, त्यामुळे तालुक्याचे आमदार, पालकमंत्री व त्याशिवाय जिल्हा नियोजन मंडळाचेही अध्यक्ष पाटीलच असतानाही नवीन शाळा खोल्या मिळालेल्या नाहीत. नवीन काही खोल्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक नितीन धांडे यांनी दिली, परंतु हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश अजाबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून शुध्द पाण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती, मात्र आता ही यंत्रणाही धूळखात पडली आहे. दोन संगणक असूनही ते बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा उपयोगच होत नाही. शौचालय, मुतारी असून नसल्यासारखी आहे. प्रयोगशाळा किंवा संगणक कक्ष नाही. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा भागण्यासाठी ज्याची गरज आहे, त्याचीच येथे कमी आहे. शिक्षक संख्या आठवरून पाचवर आली. अर्थात शासनानेच ही संख्या घटविली. सात वर्गांना पाच शिक्षक अशी स्थिती या शाळेची झाली आहे.

दुरुस्तीवर पैशांची उधळपट्टी

शाळेची दयनीय अवस्था झालेली असताना नवीन पक्क्या शाळा खोल्या देण्याऐवजी जिल्हा परिषदेकडून केवळ दुरुस्तीवरच पैशांची उधळपट्टी केली जात आहे. त्यातून नेमके काय हित साधायचे आहे, हेच कळत नाही. जिल्ह्याचे उन्हाळ्यातील तापमानाची स्थिती पाहता पत्र्याच्या खोल्यांमध्ये बसल्यावर विद्यार्थ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार न केलेलाच बरा.

कोट...

ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला आहे. गावात कोणत्या गोष्टीची अपूर्णता आहे. याचा आढावा घेतला जात आहे. गावकऱ्यांच्या प्राथमिक गरजा, शाळेत नवीन खोल्या, शुध्द पाणी, शौचालय आदी विषय तातडीने मार्गी लावले जातील. त्यासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.

-मोनिका वसंत पाटील, उपसरपंच