शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 12:37 IST

घोषणांनी समाज कल्याण कार्यालय दणाणले

ठळक मुद्दे तीन तास विद्यार्थ्यांचा ठिय्या

जळगाव : तांत्रिक अडचणीमुळे व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाही़ ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही कुणी दखल घेत नसल्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली़ तब्बल तीन तास आंदोलन सुरू होते़शिष्यवृत्ती ही बहुतांश विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग आहे. महागडे उच्चशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती एक आधार आहे. परंतू, दोन महिन्यांपासून विद्यापीठासह काही महाविद्यालयातील व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाइन अर्ज करीत आहेत़ पण, अर्ज तांत्रिक अडचणीमुळे अर्ज अपलोड होत नसल्यामुळे याबाबत समाज कल्याण विभागाला व विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी कळविले़या काळातच अर्ज सादर करण्याची मुदत निघून गेली़ मात्र, विद्यापीठ आणि समाज कल्याण विभाग एकमेकांवर बोट दाखवित विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढकार घेण्यास तयार नव्हते़अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता समाज कल्याण कार्यालयात गाठत सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली़ अधिकारी जागेवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली़घोषणाबाजीने दणाणले दालनया आंदोलनावेळी शिष्यवृत्ती आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, भारत माता की जय, सहाय्यक आयुक्त एक काम करा खुर्ची खाली करा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही अशा घोषणा देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी अभाविपचे प्रदेश सहमंत्री सिध्देश्वर लटपटे, शुभम अत्रे, ऋतुजा पाटील, कनिष्का विसपुते यांच्यासह विद्यापीठातील अभियांत्रिकीचे अमोल पाटील, वैभव निकुंभ, राकेश बेहरे, आदेश पाटील, गणेश क्षीरसागर, अश्विनी पाटील, धैर्यशील गायकवाड यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते़समस्येचा विषय जाणार पुण्यापर्यंत...सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील हे कार्यालयात दाखल झाले़ त्यांच्यासोबत विद्यापीठाचे कुलसचिव बी़बी़पाटील यांनी देखील समाज कल्याण कार्यालयात हजेरी लावली़ विद्यार्थ्यांनी पाटील यांना घेराव घालत संपूर्ण समस्या सांगितली़ तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढ देण्यात यावी आणि जे विषय पोर्टलवर अपलोड नाही ते विषय अपलोड करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली़ त्यावर योगेश पाटील यांनी १६ मार्चला पुणे संचालनालय येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल तसेच मुंबई येथे देखील व्हीजेएनटी व इतर संवर्गाबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले़ सोबतच शिष्यवृत्तीसाठी २७ मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले़ त्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले़तीन तास चालले आंदोलनअधिकारी दालनात नसल्यामुळे विद्यार्थींच्या संतापात भर पडल्यानंतर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे घेण्यात आला़ तब्बल तीन तास विद्यार्थ्याृंनी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या दालनात ठिय्या मांडला होता़ कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची समजुत घातली़ मात्र, विद्यार्थी हे आपल्या पवित्र्यावर ठाम होते़ त्यामुळे संपूर्ण दालन हे घोषणांनी दणाणून गेले होते़