शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा पेट्रोल टाकून आत्महनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

अमळनेर : टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षातील नापास विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून ...

अमळनेर : टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षातील नापास विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थ्यांसहित पोलीस प्रशासनाची मोठीच धावपळ उडाली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, अनिरुद्ध शिसोदे,सागर राजपूत, भूषण पाटील यांच्यासह सात विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पोलीस यंत्रणा आणि विद्यार्थ्यांनी समयसूचकता दाखवत हातातील पेट्रोलच्या बॉटल वेळीच फेकल्याने पुढील अनर्थ टळला, दरम्यान आंदोलनाच्या दोन-अडीच तासांनंतर प्रभारी प्राचार्य पी.आर. शिरोडे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे भूषण भदाणे यांनी सांगितले.

विद्यार्थी आत्मदहन करणार म्हणून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात होता. विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला,व जोरदार घोषणाबाजी केली, दरम्यान पोलिसांची नजर चुकवून प्रथम भूषण भदाणे यांनी अंगावर पेट्रोल ओतले,त्याला सावरत असतानाच श्रीनाथ पाटील याने पेट्रोल ओतून घेतले, पोलीस यंत्रणेने वेळीच बॉटल हिसकावून विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात अनिरुद्ध शिसोदे,सागर राजपूत, भूषण पाटील या विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,अनंत निकम यांनी मध्यस्थी करत प्राचार्य शिरोडे आणि संचालकांशी चर्चा केली त्यांनतर प्राचार्य शिरोडे यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे, मात्र योग्य तो निर्णय न झाल्यास, महाविद्यालयाच्या आवारातून दोषींची प्रतिकात्मक गाढवावरून धिंड काढू असा इशारा भूषण भदाणे यांनी दिला आहे.

प्राचार्यांचे पत्र

चौकशी समिती नेमली विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात प्राध्यापकांकडून अनवधानाने काही चुका झाल्या आहेत असे आम्हाला कळले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस देत आहोत. यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये महाविद्यालयाचे दोन प्रतिनिधी, विद्यापीठाचा प्रतिनिधी, शासनाचे दोन प्रतिनिधी, महाविद्यालयीन दोन विद्यार्थी प्रतिनिधी असे सदस्य असतील, असे लेखी पत्र प्राचार्य शिरोडे यांनी दिले आहे.