शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

विद्यार्थ्यांचा पेट्रोल टाकून आत्महनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

अमळनेर : टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षातील नापास विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून ...

अमळनेर : टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षातील नापास विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थ्यांसहित पोलीस प्रशासनाची मोठीच धावपळ उडाली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, अनिरुद्ध शिसोदे,सागर राजपूत, भूषण पाटील यांच्यासह सात विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पोलीस यंत्रणा आणि विद्यार्थ्यांनी समयसूचकता दाखवत हातातील पेट्रोलच्या बॉटल वेळीच फेकल्याने पुढील अनर्थ टळला, दरम्यान आंदोलनाच्या दोन-अडीच तासांनंतर प्रभारी प्राचार्य पी.आर. शिरोडे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे भूषण भदाणे यांनी सांगितले.

विद्यार्थी आत्मदहन करणार म्हणून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात होता. विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला,व जोरदार घोषणाबाजी केली, दरम्यान पोलिसांची नजर चुकवून प्रथम भूषण भदाणे यांनी अंगावर पेट्रोल ओतले,त्याला सावरत असतानाच श्रीनाथ पाटील याने पेट्रोल ओतून घेतले, पोलीस यंत्रणेने वेळीच बॉटल हिसकावून विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात अनिरुद्ध शिसोदे,सागर राजपूत, भूषण पाटील या विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,अनंत निकम यांनी मध्यस्थी करत प्राचार्य शिरोडे आणि संचालकांशी चर्चा केली त्यांनतर प्राचार्य शिरोडे यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे, मात्र योग्य तो निर्णय न झाल्यास, महाविद्यालयाच्या आवारातून दोषींची प्रतिकात्मक गाढवावरून धिंड काढू असा इशारा भूषण भदाणे यांनी दिला आहे.

प्राचार्यांचे पत्र

चौकशी समिती नेमली विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात प्राध्यापकांकडून अनवधानाने काही चुका झाल्या आहेत असे आम्हाला कळले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस देत आहोत. यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये महाविद्यालयाचे दोन प्रतिनिधी, विद्यापीठाचा प्रतिनिधी, शासनाचे दोन प्रतिनिधी, महाविद्यालयीन दोन विद्यार्थी प्रतिनिधी असे सदस्य असतील, असे लेखी पत्र प्राचार्य शिरोडे यांनी दिले आहे.