शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

जिल्ह्यात गृह विलगीकरणासाठी आता कडक निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला गृहविलगीकरणातील रुग्णांचीच संख्या अधिक असल्याने शिवाय यांच्यावर पुरेसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला गृहविलगीकरणातील रुग्णांचीच संख्या अधिक असल्याने शिवाय यांच्यावर पुरेसे नियंत्रण नसल्याने संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे चित्र होते. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे सुरुवातीला गृह विलगीकरणात होते. मात्र, आता हे निकष अधिक कडक करण्यात आले असून शक्यतोवर कोविड केअर सेंटरलाच रुग्ण दाखल होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हाभरात गेल्या तीन महिन्यांत संसर्गाचे प्रमाण हे प्रचंड वाढले आहे. यात मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असून एका दिवसात २४ पर्यंत मृतांची संख्या गेली आहे. यात गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अगदी कमी कालावधीत रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. दरम्यान, या गंभीर बाबींमुळे आता गृह विलगीकरणाच्या अटी अधिक कडक करण्यात आलेल्या आहेत.

एकूण रुग्ण ११०४२४

बरे झालेले रुग्ण ९७३६२

सक्रिय रुग्ण १११०७

गृह विलगीकरणातील रुग्ण ६३४०

१९ रुग्ण मृतावस्थेत

जिल्हाभरात झालेल्या एकूण १९५५ मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे वाटेतच किंवा रुग्णालयात आणण्याआधीच झाल्याची नोंद आहे. उर्वरित सर्व मृत्यू हे खासगी किंवा शासकीय रुग्णालयात झाल्याची नोंद आहे. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे विरहित रुग्णांनाच गृह विलगीकणाची सद्य:स्थितीत परवानगी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हे रुग्ण येताय गंभीर होऊन

बाधित आल्यानंतर जे रुग्ण परवानगीनुसार गृह विलगकीरणात राहत आहेत. ते गंभीर होऊन रुग्णालयात आल्याची उदाहरणे नाहीत. मात्र, तपासणी न करता लक्षणे अंगावर काढून स्थानिक खासगी डॉक्टरांचे उपचार घेत वेळ काढणारे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

आधी रुग्ण दाखल करा

कोविड केअर सेंटरमध्येच गृह विलगीकरणाचा अर्ज भेटतो. मात्र, आधी रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्णाची प्रकृती बघून डॉक्टर निर्णय घेत असतात. यानंतर सर्व नोंदणी केल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकाला ही सर्व प्रक्रिया करावी लागते. नंतर रुग्णालयातून घरी सोडले जाते.

कोट

गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करण्यात येत आहे. जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यावर आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तपासणी न करता स्थानिक पातळीवरच उपचार घेणारे रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात येत आहेत. गृह विलगीकरणातील रुग्ण गंभीर झालेले नाहीत. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक