शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरातील व्यापाराचे जवळपास ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातून संपूर्ण जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये व्यापार होत होता. मात्र, गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद होती. त्यानंतर दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली. हळूहळू व्यापार सुरू झाला. मात्र, तत्पूर्वीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. व्यापार सुरू झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे कापड बाजार आणि इतर अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी कमी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. परिस्थिती काहीअंशी सुधारली असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून व्यापारात पुन्हा एकदा अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. सध्या कापड बाजारात सामसूम जाणवायला लागली आहे.

दुपारी ऊन तर सायंकाळी निर्बंध

जळगाव शहरातील मार्केटमध्ये सध्या दुपारच्या कडक उन्हामुळे फारसे ग्राहक येत नाहीत. ऊन कमी झाल्यावर सायंकाळी पाच वाजल्यानंतर ग्राहक दुकानात येतात तर सात वाजता दुकान बंद करण्याची घाई असल्याने त्याचा फटका व्यापाराला बसत आहे. यामुळे कापड बाजार आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय आता केवळ ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे.

कोट -

सध्या शासनाने सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तू बघायला फार वेळ मिळत नाही. दुकाने किमान ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावीत. आधीच दुपारी ऊन असल्याने नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच बाहेर पडत आहेत. त्यातच लग्न सोहळ्यांवर मर्यादा असल्याने व्यापाराला फटका बसला आहे. शाळा बंद असल्याने गणवेशही विकले गेलेले नाहीत.

- रमेश मताणी, व्यापारी,

दिवसभर तापमान जास्त असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यातच सायंकाळी सात वाजताचे बंधन असल्याने पुरेसा व्यवसायही होत नाही. सततच्या निर्बंधांमुळे शहराबाहेरील नागरिक आता फारसे शहरात येत नाहीत, त्यामुळे व्यापार हळूहळू तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायला लागला आहे.

- ललित बरडिया, व्यापारी.