शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरातील व्यापाराचे जवळपास ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातून संपूर्ण जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये व्यापार होत होता. मात्र, गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद होती. त्यानंतर दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली. हळूहळू व्यापार सुरू झाला. मात्र, तत्पूर्वीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. व्यापार सुरू झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे कापड बाजार आणि इतर अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी कमी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. परिस्थिती काहीअंशी सुधारली असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून व्यापारात पुन्हा एकदा अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. सध्या कापड बाजारात सामसूम जाणवायला लागली आहे.

दुपारी ऊन तर सायंकाळी निर्बंध

जळगाव शहरातील मार्केटमध्ये सध्या दुपारच्या कडक उन्हामुळे फारसे ग्राहक येत नाहीत. ऊन कमी झाल्यावर सायंकाळी पाच वाजल्यानंतर ग्राहक दुकानात येतात तर सात वाजता दुकान बंद करण्याची घाई असल्याने त्याचा फटका व्यापाराला बसत आहे. यामुळे कापड बाजार आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय आता केवळ ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे.

कोट -

सध्या शासनाने सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तू बघायला फार वेळ मिळत नाही. दुकाने किमान ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावीत. आधीच दुपारी ऊन असल्याने नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच बाहेर पडत आहेत. त्यातच लग्न सोहळ्यांवर मर्यादा असल्याने व्यापाराला फटका बसला आहे. शाळा बंद असल्याने गणवेशही विकले गेलेले नाहीत.

- रमेश मताणी, व्यापारी,

दिवसभर तापमान जास्त असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यातच सायंकाळी सात वाजताचे बंधन असल्याने पुरेसा व्यवसायही होत नाही. सततच्या निर्बंधांमुळे शहराबाहेरील नागरिक आता फारसे शहरात येत नाहीत, त्यामुळे व्यापार हळूहळू तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायला लागला आहे.

- ललित बरडिया, व्यापारी.