शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांमुळे व्यापाराला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे जळगाव शहरातील व्यापार हा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरातील व्यापाराचे जवळपास ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

जळगाव शहरातून संपूर्ण जिल्ह्यात आणि बाहेरच्या जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये व्यापार होत होता. मात्र, गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत सर्व दुकाने बंद होती. त्यानंतर दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली. हळूहळू व्यापार सुरू झाला. मात्र, तत्पूर्वीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. व्यापार सुरू झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमताही कमी झाली होती. त्यामुळे कापड बाजार आणि इतर अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी कमी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. परिस्थिती काहीअंशी सुधारली असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून व्यापारात पुन्हा एकदा अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. सध्या कापड बाजारात सामसूम जाणवायला लागली आहे.

दुपारी ऊन तर सायंकाळी निर्बंध

जळगाव शहरातील मार्केटमध्ये सध्या दुपारच्या कडक उन्हामुळे फारसे ग्राहक येत नाहीत. ऊन कमी झाल्यावर सायंकाळी पाच वाजल्यानंतर ग्राहक दुकानात येतात तर सात वाजता दुकान बंद करण्याची घाई असल्याने त्याचा फटका व्यापाराला बसत आहे. यामुळे कापड बाजार आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय आता केवळ ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे.

कोट -

सध्या शासनाने सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना वस्तू बघायला फार वेळ मिळत नाही. दुकाने किमान ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात यावीत. आधीच दुपारी ऊन असल्याने नागरिक खरेदीसाठी सायंकाळीच बाहेर पडत आहेत. त्यातच लग्न सोहळ्यांवर मर्यादा असल्याने व्यापाराला फटका बसला आहे. शाळा बंद असल्याने गणवेशही विकले गेलेले नाहीत.

- रमेश मताणी, व्यापारी,

दिवसभर तापमान जास्त असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्यातच सायंकाळी सात वाजताचे बंधन असल्याने पुरेसा व्यवसायही होत नाही. सततच्या निर्बंधांमुळे शहराबाहेरील नागरिक आता फारसे शहरात येत नाहीत, त्यामुळे व्यापार हळूहळू तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायला लागला आहे.

- ललित बरडिया, व्यापारी.