शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

आर्द्रा नक्षत्राची विचित्र अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा ...

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा पाऊस तर दुसरा शिवार कोरडा राहत असल्याने, पावसाने सीमावाद जोपासल्याची अनुभूती येत आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता खेडगाव शिवारात दहा-पंधरा मिनिटे वादळासह झालेला पाऊस शिंदी शिवारात नव्हता.

आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून याच एका टप्प्यात चार-पाच जोरदार पाऊस झालेत. अक्षरशः दहा-बारा दिवस पावसामुळे आंतरमशागत खोळबंली होती. मागील चार दिवसापासून उघडीप दिल्याने जरा कुठे वखरणी, कोळपणी व निंदणीचा वाफसा झाला होता. तोच पावसाने हजेरी लावली. पावसाची धार पडणे, वहाय पडणे असा शब्दप्रयोग शेतकरी यास संबोधतात. मागील आठवड्यात गिरणानदीच्या उत्तरेस खेडगाव-बात्सर भागात झालेला पाऊस गिरणानदीच्या दुसरीकडे कजगाव भाग कोरडा ठेवून गेला. जणू काही पावसासाठी गिरणानदी लक्ष्मणरेषाच ठरली. यामुळे एकाच तालुक्यात पाच-सहा किमीवर एकीकडे पिके तहानलीत तर दुसरीकडे आंतरमशागतीस योग्य वाफसा होत नसल्याची स्थिती आहे. क्षणात दाटून येणारे ढग, अचानक वादळ व त्याबरोबर दडदड कोसळणारा पाऊस निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव देत आहे.

फोटो कँप्शन :

खेडगावच्या शिवारात रविवारी झालेला पाऊस

पावसाअभावी एरंडोल तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर....

एरंडोल : तालुक्यात जवळपास आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे इवल्या-इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे.

पावसाअभावी पिके कोमजत आहेत. दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

एरंडोल तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात

मृगनक्षत्र हे मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात ज्वारी, मका, उडीद, मूग, कोरडवाहू कपाशी यांचा समावेश आहे. खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे. एरंडोल, कासोदा, तळई, उत्राण, रिंगणगाव, खर्ची, रवंजे, या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. उधार, उसनवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत असा प्रश्न सर्वसामान्य

शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष हे की रोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. रविवारी पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज मात्र पाऊस हुलकावणी देतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने खऱ्या अर्थाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.