शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्रा नक्षत्राची विचित्र अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा ...

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा पाऊस तर दुसरा शिवार कोरडा राहत असल्याने, पावसाने सीमावाद जोपासल्याची अनुभूती येत आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता खेडगाव शिवारात दहा-पंधरा मिनिटे वादळासह झालेला पाऊस शिंदी शिवारात नव्हता.

आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून याच एका टप्प्यात चार-पाच जोरदार पाऊस झालेत. अक्षरशः दहा-बारा दिवस पावसामुळे आंतरमशागत खोळबंली होती. मागील चार दिवसापासून उघडीप दिल्याने जरा कुठे वखरणी, कोळपणी व निंदणीचा वाफसा झाला होता. तोच पावसाने हजेरी लावली. पावसाची धार पडणे, वहाय पडणे असा शब्दप्रयोग शेतकरी यास संबोधतात. मागील आठवड्यात गिरणानदीच्या उत्तरेस खेडगाव-बात्सर भागात झालेला पाऊस गिरणानदीच्या दुसरीकडे कजगाव भाग कोरडा ठेवून गेला. जणू काही पावसासाठी गिरणानदी लक्ष्मणरेषाच ठरली. यामुळे एकाच तालुक्यात पाच-सहा किमीवर एकीकडे पिके तहानलीत तर दुसरीकडे आंतरमशागतीस योग्य वाफसा होत नसल्याची स्थिती आहे. क्षणात दाटून येणारे ढग, अचानक वादळ व त्याबरोबर दडदड कोसळणारा पाऊस निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव देत आहे.

फोटो कँप्शन :

खेडगावच्या शिवारात रविवारी झालेला पाऊस

पावसाअभावी एरंडोल तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर....

एरंडोल : तालुक्यात जवळपास आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे इवल्या-इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे.

पावसाअभावी पिके कोमजत आहेत. दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

एरंडोल तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात

मृगनक्षत्र हे मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात ज्वारी, मका, उडीद, मूग, कोरडवाहू कपाशी यांचा समावेश आहे. खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे. एरंडोल, कासोदा, तळई, उत्राण, रिंगणगाव, खर्ची, रवंजे, या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. उधार, उसनवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत असा प्रश्न सर्वसामान्य

शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष हे की रोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. रविवारी पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज मात्र पाऊस हुलकावणी देतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने खऱ्या अर्थाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.