शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

कापूस खरेदी थांबल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील तुरखेडा शिवारात यंदा ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील तुरखेडा शिवारात यंदा ‘सीसीआय’चे

कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु, कापूस खरेदी नियमितपणे

केली जात नसल्याने त्याचा काहीएक उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

ठराविक केंद्रांवर कापसाची खरेदी करणाऱ्या यंत्रणेच्या अनास्थेमुळे हे

केंद्र सध्या ओस पडले आहे.

‘सीसीआय’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा

कापूस खरेदी करण्यासाठी सध्या जळगाव शहरातील शिवाजीनगरात तसेच तालुक्यातील

आव्हाणे शिवारात आणि तुरखेडे शिवारात अशी पाच ठिकाणी केंद्रे का र्यान्वित

करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात आव्हाणे शिवारातील काही केंद्रे वगळता

अन्यत्र कापूस खरेदी करताना ‘सीसीआय’च्या यंत्रणेने सपशेल हात आखडता

घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तुरखेडे येथील खरेदी केंद्राकडे

यंत्रणेने सोयीस्कर दुर्लक्ष केले असून त्याठिकाणी आठवड्यातून एकदा कधीतरी

कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला जात असल्याने परिसरातील सुमारे ५० ते ६०

गावांमधील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जवळच्या खरेदी केंद्रावर

कापूस खरेदी केला जात नसल्याने त्यांना लांब अंतरावरील आव्हाण्याच्या खरेदी

केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन जावा लागत आहे. त्यासाठी ट्रॅक्टरच्या

भाड्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. दुसरी गोष्ट

आव्हाण्यात नियमित कापूस खरेदी होत असली तरी सकाळपासून सायंकाळपर्यंत कायम

गर्दी राहत असल्याने शेतीची तातडीने कामे सोडून अनेकांना तिथे ताटकळत बसावे

लागते. प्रसंगी कापसाची राखणदारी करण्यासाठी रात्री मुक्कामीसुद्धा

थांबण्याची वेळ येते. ही स्थिती लक्षात घेता तुरखेडे येथील केंद्रावर

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीला तत्काळ वेग द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात

येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.