शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

आरटीओ कॅम्पमध्ये गोंधळ, रास्ता रोको

By admin | Updated: March 1, 2017 00:13 IST

जामनेर : वाहन परवान्यासाठी गर्दी वाढल्याने वाहनधारक संतप्त

जामनेर : येथील शासकीय विश्रामभवनात मंगळवारी वाहन परवाना काढणा:या वाहनधारकांची प्रचंड गर्दी झाल्याने उपस्थित दोघा सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी रांगेतील फक्त 100 नागरिकांच्या परवान्याबाबत कार्यवाही केली व उर्वरितांना तुम्ही पुढील महिन्यात या, असे सांगितल्याने मोठा गोंधळ उडाला.  मात्र अधिकारी ऐकत नसल्याने उपस्थित नागरिकांनी अखेर जामनेर-जळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, बी.ङोड.जाने व सहका:यांनी धाव घेऊन नागरिकांची समजूत घातली. रास्ता रोको होत असल्याचे पाहून दोघा वाहन निरीक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला जामनेर शहरात आरटीओचा कॅम्प होतो. यामुळे शिकाऊ व कायम असे दोन्ही परवाने काढण्यासाठी वाहनधारकांची गर्दी होते. मंगळवारी सकाळपासूनच नागरिक विश्रामभवनात थांबून होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी गर्दी पाहून सर्वाना रांगेत उभे केले व त्यातील 100 जणांचे अर्ज स्वीकारले व राहिलेल्यांना पुढील महिन्यात या, असे सांगितले. यानंतर गोंधळ वाढला. परवाने काढण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी वाहन निरीक्षकांना घेराव घालून जाब विचारला. आम्ही फक्त दोघेच असल्याने 100 जणांचे अर्ज स्वीकारले.दीड वाजेनंतरही हा गोंधळ सुरूच होता. अशातच त्रस्त नागरिकांनी विश्रामभवनसमोरून जाणारा जामनेर-जळगाव रस्ता अडवून रास्ता रोको आंदोलन केले व अधिका:यांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. हा प्रकार वाढतच असल्याचे पाहून कुणीतरी पोलिसांना ही माहिती दिली. उपनिरीक्षक विशाल पाटील, बी.ङोड. जाने यांनी या ठिकाणी येऊन नागरिकांची समजूत घातली. या वेळी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य अमर पाटील उपस्थित होते.दरम्यान, रास्ता रोको आंदोलन सुरू होताच दोघा मोटार वाहन निरीक्षकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोरसुद्धा या वाहन निरीक्षकांनी आपली बाजू मांडली.जामनेर तालुका हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा असून 170 गावे आहेत. प्रत्येक महिन्यात वाहन परवाना काढणा:यांची नेहमीच मोठी गर्दी होते. परिवहन विभागाने शेंदुर्णी किंवा पहूर या ठिकाणीदेखील कॅम्प घ्यावा, असे उपस्थितांचे म्हणणे होते. (वार्ताहर)वाहन नोंदणी व परवाना काढणा:या नागरिकांनी कॅम्पच्या ठिकाणी न येता परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी व त्यांना हव्या असलेल्या दिवसाची अपॉईंटमेंट घेऊन कार्यालयात यावे. या सुविधेमुळे नागरिकांचा मोठा त्रास वाचतो. जिल्ह्यात फक्त 10 मोटार वाहन निरीक्षक असल्याने  एका दिवशी फक्त एक अधिकारी 100 जणांचे अर्ज स्वीकारून कार्यवाही केली जाते. गर्दीतला त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा.-अतुल पवार,सहायक मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयसकाळी आठ वाजेपासून परवाना काढण्यासाठी रांगेत उभा होतो. मात्र मोटार वाहन निरीक्षकांनी फक्त 100 जणांचेच अर्ज स्वीकारले व आम्हाला पुढील महिन्यात येण्यास सांगितले. उपप्रादेशिक परिवहन विभागाने जादा निरीक्षकांची नेमणूक करावी म्हणजे काम जलद गतीने होईल. -मंगलसिंग राजपूत, काळखेडे, ता.जामनेरजिल्ह्यात जामनेर तालुका मोठा असल्याने महिन्यातून दोन वेळेस कॅम्प झाला पाहिजे. कॅम्पसाठी विभागाने जादा मोटार वाहन निरीक्षक पाठविल्यास नागरिकांचे काम लवकर होईल. परवाना नूतनीकरण,  शिकाऊ व कायम परवाना काढणा:यांची गर्दी वाढते, गोंधळ होतो. हे टाळण्यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे. -अमर पाटील, तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा