शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

अमृतची कामे थांबवून रस्त्यांची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, मनपाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांकडून तीव्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, मनपाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने, पावसाळ्यातील काही महिने ही कामे बंद करून, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे, तसेच या मागणीसाठी मनसेकडून शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, नीलेश अजमेरा, संतोष सुरवाडे, रमेश भोई, नीलेश खैरनार, बळीराम पाटील, ॲड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे आदी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, कासमवाडी भागातील एका नागरिकाचा याच रस्त्यांमुळे बळी गेला. महापालिकेकडून अनेक भागातील रस्तेच आतापर्यंत तयार करण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणचे रस्ते अमृत योजनेमुळे खराब झाले आहेत. मनपाने पावसाळ्यात रस्त्यांमुळे होणारी गैरसोय पाहता, अमृत अंतर्गत सुरू असलेले खोदकाम थांबविण्याची मागणी केली आहे, तसेच हे काम थांबवून तत्काळ दुरुस्तीचे कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. मनपाने हे काम थांबविले नाही, तर मनसेकडून शहरातील अमृतची कामे थांबविण्याचा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला आहे.