शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमृतची कामे थांबवून रस्त्यांची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, मनपाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांकडून तीव्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, मनपाकडून दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने, पावसाळ्यातील काही महिने ही कामे बंद करून, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे, तसेच या मागणीसाठी मनसेकडून शुक्रवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, महेश माळी, गणेश नेरकर, गोविंद जाधव, विशाल कुमावत, नीलेश अजमेरा, संतोष सुरवाडे, रमेश भोई, नीलेश खैरनार, बळीराम पाटील, ॲड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे आदी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, कासमवाडी भागातील एका नागरिकाचा याच रस्त्यांमुळे बळी गेला. महापालिकेकडून अनेक भागातील रस्तेच आतापर्यंत तयार करण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणचे रस्ते अमृत योजनेमुळे खराब झाले आहेत. मनपाने पावसाळ्यात रस्त्यांमुळे होणारी गैरसोय पाहता, अमृत अंतर्गत सुरू असलेले खोदकाम थांबविण्याची मागणी केली आहे, तसेच हे काम थांबवून तत्काळ दुरुस्तीचे कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. मनपाने हे काम थांबविले नाही, तर मनसेकडून शहरातील अमृतची कामे थांबविण्याचा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला आहे.