शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

पारोळा येथे महामार्गावर बैलगाडी लावून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:45 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैलगाडी असलेल्या शेतकऱ्यांना टोकन न मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी आपली बैलगाडी महामार्गावर आडवी लावून रास्ता रोको केला.

ठळक मुद्देबैलगाडी आणल्याने टोकन देण्यात भेदभावाचा आरोपसचिव म्हणतात, टोकन पुस्तक संपले होते म्हणून उशिर झाला

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैलगाडी असलेल्या शेतकऱ्यांना टोकन न मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी आपली बैलगाडी महामार्गावर आडवी लावून रास्ता रोको केला. यामुळे वाहनांची मोठी रांग महामार्गाच्या दोन्ही बाजूला लागल्या. अखेर पोलिसांनी शेतकºयांची समजूत काढून रास्ता रोको मागे घेतला व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आपली बैलगाडी लावून दिली.सूत्रांनुसार, २८ रोजी सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी वाहन परवड नसल्याने स्वत:च्या बैलगाडीत कापूस विक्रीसाठी आणला होता. पण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या शेतकºयांच्या बैलगाडीस टोकन देत नसल्याने सर्वच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तुम्ही वाहनांना टोकन देत आहेत. पण आम्हाला का टोकन दिले जात नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला. आम्ही गरीब शेतकरी कापूस विक्रीला आणताना आमच्याकडून वाहनांना भाडे देण्यास पैसे नाही. मग आम्ही कापूस बैलगाडीत विक्रीसाठी आणला हा आमचा गुन्हा आहे का? व्यापाºयाच्या वाहनाना तत्काळ टोकन पुरविले जातात. खºया शेतकºयास वेठीस धरले जाते, असा संतप्त सवाल काही शेतकºयांनी उपस्थित केला.मग टोकन मिळत नसल्याने सर्व शेतकºयांनी आपली बैलगाडी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आशिया महामार्गावर आडवी लावून सुमारे १५ ते २० मिनिटे रास्ता रोको केला. या वेळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक फौजदार बापू पाटील, सत्यवान पवार, सुनील पवार यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकºयांची समजूत काढली व महामार्गावरून आपली बैलगाडी बाजूला केली. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.संतप्त शेतकºयांनी मात्र आपली बैलगाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून उन्हात बैल बांधून याबाबत संताप व्यक्त केला. कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा कापूस वाहनांच्या आधी मोजला जावा, अशीही मागणी शेतकºयांनी या वेळी केली.टोकन पुस्तक संपले होते म्हणून उशिर झाला.शेतकºयांना वाटप करण्यात येणारे टोकन पुस्तक हे शासनाकडून येते. टोकन पुस्तक संपले होते. नव्याने टोकन पुस्तक येणास उशीर झाला. म्हणून आज टोकन वाटपास उशीर झाला. टोकन पुस्तक उपलब्ध झाल्याबरोबर सर्व बैलगाडीधारकांना सर्वात आधी टोकन देण्यात आले. यामुळे थोडासा गोंधळ उडाला. शेतकरी एकूण घेण्याच्या मनस्थितीत न होते. पण दुपारी एकला सर्वांना टोकन वाटप सुरळीत चालू केले. अशी प्रतिक्रिया कृउबा सचिव रमेश चौधरी यांनी व्यक्त केली.शेतकºयांची थट्टाज्या शेतकºयांसाठी पणन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या केंद्रावर व्यापाºयांचा माल सर्रास विकला जात आहे. पण शेतकºयांच्या बैलगाडीस मात्र वेठीस धरले जात आहे. उन्हात बैलगाडीसह शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. एक प्रकारे शेतकºयांची थट्टा केली जात आहे. शेतकºयांचा कोणी वाली राहिला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी भास्कर ओंकार पाटील यांनी व्यक्त केली.