शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

पारोळा येथे महामार्गावर बैलगाडी लावून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:45 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैलगाडी असलेल्या शेतकऱ्यांना टोकन न मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी आपली बैलगाडी महामार्गावर आडवी लावून रास्ता रोको केला.

ठळक मुद्देबैलगाडी आणल्याने टोकन देण्यात भेदभावाचा आरोपसचिव म्हणतात, टोकन पुस्तक संपले होते म्हणून उशिर झाला

रावसाहेब भोसलेपारोळा, जि.जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बैलगाडी असलेल्या शेतकऱ्यांना टोकन न मिळाल्याने संतप्त शेतकºयांनी आपली बैलगाडी महामार्गावर आडवी लावून रास्ता रोको केला. यामुळे वाहनांची मोठी रांग महामार्गाच्या दोन्ही बाजूला लागल्या. अखेर पोलिसांनी शेतकºयांची समजूत काढून रास्ता रोको मागे घेतला व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आपली बैलगाडी लावून दिली.सूत्रांनुसार, २८ रोजी सकाळी ११.३० वाजता तालुक्यातील अनेक शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी वाहन परवड नसल्याने स्वत:च्या बैलगाडीत कापूस विक्रीसाठी आणला होता. पण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या शेतकºयांच्या बैलगाडीस टोकन देत नसल्याने सर्वच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तुम्ही वाहनांना टोकन देत आहेत. पण आम्हाला का टोकन दिले जात नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला. आम्ही गरीब शेतकरी कापूस विक्रीला आणताना आमच्याकडून वाहनांना भाडे देण्यास पैसे नाही. मग आम्ही कापूस बैलगाडीत विक्रीसाठी आणला हा आमचा गुन्हा आहे का? व्यापाºयाच्या वाहनाना तत्काळ टोकन पुरविले जातात. खºया शेतकºयास वेठीस धरले जाते, असा संतप्त सवाल काही शेतकºयांनी उपस्थित केला.मग टोकन मिळत नसल्याने सर्व शेतकºयांनी आपली बैलगाडी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आशिया महामार्गावर आडवी लावून सुमारे १५ ते २० मिनिटे रास्ता रोको केला. या वेळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक फौजदार बापू पाटील, सत्यवान पवार, सुनील पवार यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकºयांची समजूत काढली व महामार्गावरून आपली बैलगाडी बाजूला केली. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.संतप्त शेतकºयांनी मात्र आपली बैलगाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून उन्हात बैल बांधून याबाबत संताप व्यक्त केला. कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा कापूस वाहनांच्या आधी मोजला जावा, अशीही मागणी शेतकºयांनी या वेळी केली.टोकन पुस्तक संपले होते म्हणून उशिर झाला.शेतकºयांना वाटप करण्यात येणारे टोकन पुस्तक हे शासनाकडून येते. टोकन पुस्तक संपले होते. नव्याने टोकन पुस्तक येणास उशीर झाला. म्हणून आज टोकन वाटपास उशीर झाला. टोकन पुस्तक उपलब्ध झाल्याबरोबर सर्व बैलगाडीधारकांना सर्वात आधी टोकन देण्यात आले. यामुळे थोडासा गोंधळ उडाला. शेतकरी एकूण घेण्याच्या मनस्थितीत न होते. पण दुपारी एकला सर्वांना टोकन वाटप सुरळीत चालू केले. अशी प्रतिक्रिया कृउबा सचिव रमेश चौधरी यांनी व्यक्त केली.शेतकºयांची थट्टाज्या शेतकºयांसाठी पणन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या केंद्रावर व्यापाºयांचा माल सर्रास विकला जात आहे. पण शेतकºयांच्या बैलगाडीस मात्र वेठीस धरले जात आहे. उन्हात बैलगाडीसह शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. एक प्रकारे शेतकºयांची थट्टा केली जात आहे. शेतकºयांचा कोणी वाली राहिला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी भास्कर ओंकार पाटील यांनी व्यक्त केली.