शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मोठ्या ग्रामपंचायतींमधून उमेदवारी अर्जाबाबत अजूनही अनुत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:11 IST

जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवार, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात ...

जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला बुधवार, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असली तरी पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात केवळ ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीविषयी ग्रामीण भागात मोठा उत्साह असला तरी जळगाव तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे चित्र पाहिले तर या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत अजूनही अनुत्सुकता दिसून येत आहे. तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, यासाठी अजूनपर्यंत केवळ तीनच अर्ज दाखल झाले आहे.

जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. यात २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली खरी मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी २४ रोजी जळगाव तालुक्यात केवळ ममुराबाद, तुरखेडा, चिंचोली येथील प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.

निवडणूक ४३ ग्रामपंचायती, अर्ज केवळ तीन

जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्र. बो., शिरसोली प्र. न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रूक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रूक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदींचा समावेश आहे. या ४३ ग्रामंपंचायतींमधून ४६३ उमेदवार निवडून द्यायचे आहे. ही संख्या व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेले दिवस पाहता शेवटच्या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस अर्थात ३० डिसेंबरला प्राधान्य राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोठ्या ग्रामपंचायतींमधून एकही अर्ज नाही

जळगाव तालुक्यातील नशिराबाद, शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र.न., म्हसावद, वावडदे, आव्हाणे, असोदा आदी मोठ्या ग्रामपंचायतींमधून एकही अर्ज दाखल झालेला नाही. यात ममुराबाद या मोठ्या ग्रामपंचायतमधून केवळ एकच अर्ज दाखल झालेला आहे.