शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

चिंचपाणी धरणात अद्याप मृतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 18:39 IST

बिडगाव, ता.चोपडा : परिसरात आठ दिवस संततधार पाऊस झाला. मात्र तालुक्यातील चिंचपाणी धरणात अद्याप मृतसाठाच आहे. २० ते २५ ...

बिडगाव, ता.चोपडा : परिसरात आठ दिवस संततधार पाऊस झाला. मात्र तालुक्यातील चिंचपाणी धरणात अद्याप मृतसाठाच आहे. २० ते २५ गावांसाठीवरदान ठरणाऱ्या चिंचपाणी धरणात फक्त १० ते १२ टक्के साठा असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे. त्यासाठी या भागात जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.तालुक्यातील बिडगाव, मोहरद, धानोरा, वरगव्हाण, कुंड्यापाणी, लोणी खर्डी, पंचक, देवगाव, पारगाव यांच्यासह अनेक गांवाना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारे चिंचपाणी धरण गेल्या तीन वर्षांपासून भरले जात नाही.अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे. मात्र चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील चिंचपाणी धरण मात्र अद्याप भरलेले नाही. तालुक्यात झालेल्या संतधार पावसानंतरही धरणात फक्त मृतसाठाच शिल्लक आहे. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. धरण परिसरात जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.सलग आठ दिवस तालुक्यात झालेल्या भिजपावसाने बहुतांश भागात समाधानकारक परिस्थीती झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत आहे.तब्बल ९५ टक्के विहरी यावर्षी कोरड्या पडल्या, तर लाखो रुपये खर्च करून केलेल्या ट्यूबवेल्सही बंद पडत आहेत. त्याचा मोठा फटका बसून यावर्षी शेकडो एकरवरील जगवलेल्या केळी जळून गेल्या आहेत. शेतकरीवर्ग सिंचनासाठी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापल्याचे धक्कादायक चित्र यावर्षी परिसरात पाहावयास मिळाले. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी मोठ्या आशेने चिंचपाणी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत आहे.धरणाचे वसांड्याचे कामही झाल्याने पातळीची क्षमताही दहा फुटांनी वाढलीे. मात्र हे काम झाल्यापासून धरण भरलेच नाही. अद्यापही धरणात मृत साठाच आहे. धरण परिसरात यावर्षी तरी जोरदार पाऊस पडून धरण भरेल, अशी आशा शेतकरी बाळळगून आहेत.