शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

सोशल मीडियापासून दूर रहा, जीवनाचा अर्थ सापडेल - यशपाल शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:11 IST

तरुणाईला सल्ला : मनापासून काम करा, कोणत्याही क्षेत्रात हमखास यश

ठळक मुद्देसकारात्मक परिस्थिती आपल्याला तयार करावी लागतेचांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदानआभासी जगात तरुणाई भरकटतेय

ऑनलाईन लोकमत 

जळगाव, दि. 10 - आपण जे काम करतो त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून द्या. जे करू ते मनापासून करू असा निश्चय करा, मग बघा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असा यशाचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते यशपाल शर्मा यांनी तरुणाईला दिला. या सोबतच जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर काही काळ मोबाईल, सोशल मीडिया या भ्रमीक जगाला बाजूला सारा, मग तुम्हाला जीवनाचा अर्थ सापडेल, असाही सल्ला त्यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यावतीने यशपाल शर्मा यांचा तरुणाईशी संवाद साधण्यासाठी ‘यूथ मीट’ या कार्यक्रमाचे गुरुवारी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. आदिवासी बांधवांसाठी लढणा:या नंदुरबार जिल्ह्यातील ङिालाबाई यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. अभिनेत्री तथा दिग्दर्शिका प्रतिभा शर्मा, क्लबचे अध्यक्ष अॅड. सूरज जहाँगिर, उपाध्यक्ष गनी मेनन, सचिव कृष्णकुमार वाणी, ङिालाबाई, जननायक फाउंडेशनचे होनाजी चव्हाण उपस्थित होते. 

आभासी जगात तरुणाई भरकटतेयतरुणाईशी गप्पा मारताना सर्व प्रथम यशपाल शर्मा यांनी आजची तरुणाई भरटली असल्याचे सांगून त्यांना यातून सावरण्याचे आवाहन केले. काही काळ मोबाईलला दूर सारा व जेथे नेटवर्क नाही तेथे जाऊन बघा, तेथे मनाला किती शांती मिळेल. आज जगासोबत चालले पाहिजे, असेही ते म्हणाले, मात्र या अभासी जगाच्या आहारी न जाता जे कर्म कराल, ते पूर्ण मनापासून करा, तुम्ही हमखास यशस्वी व्हाल, असेही त्यांनी नमूद केले. 

चांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदानअभासी जगातून बाहेर पडून तुम्ही चांगल्या साहित्याचे वाचन करा. चांगल्या व्यक्तिमत्वासाठी साहित्याचे मोठे योगदान असल्याचे सांगून मराठीतील शिवाजी सावंत, वसंत देव, विजय तेंडुलकर या लेखकांचा त्यांनी आवजरून उल्लेख केला. यांच्यासह इतरही लेखकांचे साहित्य तुम्ही वाचल्यास विचार प्रगल्भ होतील व तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. 

सकारात्मक परिस्थिती आपल्याला तयार करावी लागतेकोठेही गेला तर तेथे तुम्हाला तुमच्या दृष्टीने, तुमच्या कामाच्या दृष्टीने सकारात्मक परिस्थिती मिळत नाही तर ती आपल्याला तयार करावी लागते, असा यशाचा मंत्र त्यांनी तरुणाईला दिला. 

खलनायकाची भूमिका सर्वात चांगली म्हणताच टाळ्य़ाचा कडकडाटएरव्ही चित्रपटातील नायकाची भूमिका सर्वाना आवडते. मात्र माङया दृष्टीने खलनायकाची भूमिका सर्वात चांगली आहे. कारण संपूर्ण चित्रपटात तो नायकाला त्रास देत असतो व आनंद घेत असतो. त्यामुळे हीच भूमिका मला जास्त आवडते, असे उत्तर भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला यशपाल यांनी दिले. त्यांच्या या उत्तरावर संपूर्ण सभागृहात टाळ्य़ांचा कडकडाट झाला. तुम्ही एकदम चांगले, नम्र वागून चालणार नाही, थोडे खोडकर असायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले. रंगमंच हेच खरे साधनेचे ठिकाणचित्रपट व नाटक यांच्यातील तुलनेबाबत बोलताना यशपाल म्हणाले, नाटकातूनच खरी भूमिका साकारली जाते. त्यामुळे रंगमंच हेच खरे साधनेचे ठिकाण आहे.  

‘वो कल भी चुना लगाते थे और आज भी चुना लगा रहे है..’आपल्या गप्पांचा शेवट यशपाल यांनी काही काव्य ओळींनी केला. यामध्ये त्यांनी नेत्यांच्या भूमिकेवरील कविता मांडताना सांगितले की, एका नेत्याची हकालपट्टी होऊन तो पान टपरी चालवू लागला. त्यावर पत्नी म्हणते, बघा एका नेत्याचे हाल ते पान टपरी चालवित आहे. त्यावर पतीने उत्तर दिले, ‘वो कल भी चुना लगाते थे और आज भी चुना लगा रहे है..’, या ओळींनी सभागृहात जोरदार हशा पिकला. आयुष्यात अविस्मरणीय क्षणङिालाबाई यांच्यावर लघुपट तयार करणा:या, यशपाल शर्मा यांच्या पत्नी प्रतिभा शर्मा यांनी सांगितले की, मी जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील असून प्रतिभा शिंदे या माङया चांगल्या मैत्रीण आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी हा विषय घेतला व या लघुपटासाठी मला पाच वर्षे लागली. यातील प्रत्येक क्षण मला चांगला वाटतो. ङिालाबाई व माङो काही जुने नाते असावे, त्यामुळे आमच्यात खूप चांगला संवाद आहे.  हा विषय माङया आयुष्यातील अविस्मरणीय विषय असल्याचे त्यांनी सांगितले.