शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

दहा केंद्रांवर झाली राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:33 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस) परीक्षा रविवारी जिल्ह्यातील दहा केंद्रांवर पार ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस) परीक्षा रविवारी जिल्ह्यातील दहा केंद्रांवर पार पडली. यात पेपर-१ ला १०५ तर पेपर-२ ला १०७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवीपर्यंतच दिली जाते.

२,४७७ विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी

राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी जिल्ह्यातून २ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. रविवारी जिल्ह्यातील दहा केंद्रांवर सकाळी बौध्दिक क्षमता चाचणी व दुपारी शालेय क्षमता चाचणी या दोन विषयांवर प्रत्येकी शंभर गुणांवर पेपर घेण्यात आला. बौध्दिक क्षमता चाचणी पेपरला २३७२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती, तर १०५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. नंतर दुपारी झालेल्या शालेय क्षमता चाचणी पेपरला २३७० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर १०७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती.