शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

धुळे जिल्हा ठरतोय राजकीय प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 13:03 IST

धुळे, नंदुरबारवर राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित ; पंतप्रधान मोदी यांच्या सभेला राहुल गांधी यांच्या सभेद्वारे प्रत्युत्तर भाजपाकडून जळगाव तर राष्टÑवादीकडून रावेर मतदारसंघासाठी अद्यापही चाचपणी; उलथापालथीची दाट शक्यता

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार या लोकसभेच्या चार जागा सद्यस्थितीत भाजपाकडे आहेत. २०१४ च्या लाटेचा परिणाम आणि डॉ.विजयकुमार गावीत यांची कन्या डॉ.हिना या भाजपाच्या उमेदवार असल्याने नंदुरबार हा काँग्रेसचा अजेय असलेला मतदारसंघदेखील भाजपाने काबीज केला. धुळ्यात रामदास गावीत, प्रतापराव सोनवणे यांच्यारुपाने भाजपाने यापूर्वी तेथे पाय रोवलेले आहेत. त्यामुळे डॉ.सुभाष भामरे यांच्या विजयाचे आश्चर्य वाटले नाही. जळगाव जिल्हा तर भाजपाचा बालेकिल्ला आहे. ही राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस आघाडीला नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याकडून मोठी अपेक्षा आहे. माणिकराव गावीत, सुरुपसिंग नाईक, चंद्रकांत रघुवंशी, दीपक पाटील, पद्माकर वळवी, के.सी.पाडवी हे नंदुरबारातील तर रोहिदास पाटील, अमरीषभाई पटेल, डॉ.हेमंत देशमुख, राजवर्धन कदमबांडे, डी.एस.अहिरे, शिवाजीराव दहिते ही धुळे जिल्ह्यातील मातब्बर आणि प्रभावशाली नेते मंडळी दोन्ही काँग्रेसकडे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र, शिक्षणसंस्था ही शक्तिस्थाने आघाडीच्या नेत्यांकडे आहेत. त्यामुळे एकसंघपणे या निवडणुका लढल्यास यश मिळू शकते, या ईर्षेने प्रयत्न सुरु झाले आहेत. राहुल गांधी यांची महाराष्टÑातील पहिली प्रचार सभा धुळ्यात घेण्याचे प्रयोजन हे आहे.भाजपाच्यादृष्टीने नंदुरबार आणि धुळे हा मतदारसंघ आता प्रतिष्ठेचा बनलेला आहे. धुळे महापालिकेत अलिकडे मिळविलेल्या विजयामुळे डॉ.सुभाष भामरे, जयकुमार रावल यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन त्यांनी या जागेचे महत्त्व जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये बिंबविले आहे. धुळे-मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, सुलवाडे-जामफळ योजनांचा शुभारंभ हा त्यांच्यादृष्टीने मैलाचा दगड आहे. आमदार अनिल गोटे यांची नाराजी हा विषय भाजपा आता फार गांभीर्याने घेत नाही, हे दिसून आले. नंदुरबारात उमेदवारीवरुन सुरु असलेला संभ्रम दूर झाल्याने डॉ.हिना गावीत या प्रचाराच्या रणांगणात उतरल्या आहेत. ३० वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. ७ वेळा आमदार झालेले के.सी.पाडवी यांच्याशी त्यांची लढत राहणार आहे. साक्री, शिरपूर हे धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ नंदुरबारला जोडले गेले आहेत. हे दोन आणि नवापूर, धडगावदेखील काँग्रेसकडे आहेत.विधानसभा निवडणुकीची समीकरणे या लोकसभा निवडणुकीत निश्चित होणार आहे. आपल्या मतदारसंघातून पक्षीय उमेदवाराला मताधिक्य दिल्यास विधानसभेची उमेदवारी प्रबळ होणार असल्याने अंतर्गत मतभेद, युती-आघाडीतील वाद विसरुन सगळे एकदिलाने काम करतील, असा अंदाज पक्षश्रेष्ठींना आहे.

जळगाव जिल्हा हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्थापनेनंतर राष्टÑवादी काँग्रेसची झालेली वेगवान घोडदौड हा सत्तेच्या ऊबेचा परिणाम असल्याचे गेल्या पाच वर्षात दिसून आले. जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, जिल्हा परिषद आणि विधान परिषद निवडणुकीत राष्टÑवादीसह काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांनी केलेल्या तडजोडी जगजाहीर आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपाला किती आव्हान देऊ शकतात, याविषयी शंका येते. नेतृत्वाची खांदेपालट, सत्तेचा मोजक्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला लाभ या गोष्टी भाजपासाठी अडचणीच्या आहेत.धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अद्यापही तग धरुन आहे . २०१४ च्या मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा गमावल्या असल्या तरी विधानसभेच्या ९ पैकी ५ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. धुळे, दोंडाईचा, शिंदखेडा, शहादा, तळोदा या पालिका गमावल्या तरी नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर या पालिका काँग्रेसकडे कायम राहिल्या. जिल्हा परिषद, जिल्हा बँक काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा अशा दोघांनाही याठिकाणी समान संधी आहे.