शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शेतकऱ्यांविषयी राज्य सरकारचा बेगडी कळवळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

जळगाव : एकीकडे शेतकऱ्यांसाठी घोषणा करीत स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणारे राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करीत ...

जळगाव : एकीकडे शेतकऱ्यांसाठी घोषणा करीत स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणारे राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करीत असल्याने राज्य सरकारचा शेतकऱ्यांविषयीचा हा बेगडी कळवळा आहे, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवारी केला.

महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. याद्वारे जनतेला अंधारात टाकण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने सुरू असल्याचा आरोप करीत महावितरणच्या निषेधार्थ शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी भाजपच्या वतीने महावितरण केंद्रांवर ‘टाळा ठोको व हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये जळगावातही आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी आमदार भोळे यांनी राज्य सरकारवर वरील आरोप केला.

योजनांची घोषणा, मात्र वीजपुरवठा खंडित

राज्य सरकारला वेळीच जाग आली पाहिजे, यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांविषयी हे सरकार कळवळा दाखवीत असले तरी आघाडीत बिघाडी झालेले हे सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करीत आहे. आमच्या सरकारच्या काळात एकाही शेतकऱ्याचा वीजपुरवठा आम्ही खंडित केला नाही, असा दावाही या वेळी आमदार भोळे यांनी केला.

कार्यालयाला ठोकले टाळे

महावितरणच्या कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधातील तसेच वीज बिल माफ झालेच पाहिजे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी सरकारच्या निषेधाचे फलकही झळकविण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाला आंदोलकांनी टाळे ठोकले.

मुख्य प्रवेशद्वाराला कडीकोयंडा नसल्याने प्रवेशद्वार खुले

महावितरणच्या मुख्य प्रवेशद्वाराला फाटक आहे. मात्र त्याला कडीकोयंडा नसल्याने आंदोलकांनी आतमध्ये जात कार्यालयाच्या दरवाजाला टाळे लावले.

आकडे टाकणाऱ्यांचा त्रास इतरांना का?

या वेळी महावितरणच्या कारभारावरही आमदार भोळे यांनी टीका केली. यात ज्या भागात आकडे टाकले जातात तेथे जे ग्राहक वीज भरतात त्यांनाही खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार भोळे म्हणाले. इतरांच्या चुकांचा त्रास बिल भरणाऱ्यांनी का सहन करावा, असा सवाल या वेळी करण्यात आला.

या आंदोलनावेळी आमदार भोळे यांच्यासह जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, नगरसेवक भगत बालाणी, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, सरिता नेरकर, रेखा कुलकर्णी, पार्वताबाई भिल, डॉ. राधेश्याम चौधरी, जितेंद्र मराठे, विकी सोनार, रेखा वर्मा, प्रवीण कोल्हे आदी उपस्थित होते.