शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्य शासनाची सापत्न वागणूक

By admin | Updated: October 9, 2014 15:02 IST

राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत.

जळगाव : राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत. परिणामी शासनस्तरावर जळगावचे प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी सक्षम नेताच नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे. 

सुरेशदादांनी विकास केला
शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आमदार सुरेशदादांनी दूरदृष्टी ठेवून वाघूर योजना केली नसती तर उन्हाळ्यात जळगावकरांना शहर सोडून जाण्याची वेळ आली असती. उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये १५-२0 दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना जळगावमध्ये मात्र दोन दिवसांआड पाणी मिळाले. दादांनी जळगावचा विकास केला. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पाहिले तर इतका नियोजनबद्ध विकास झालेला दिसत नाही. 
..तर जळगावचे होईल सिंगापूर
मनपाला निधीचा प्रश्न आहे. जनतेवर भार पडू न देता विकास करण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना ओढून आणणे गरजेचे आहे. मात्र आमदार सुरेशदादांसारखेच सक्षम नेतृत्वाची अनुपस्थिती तिव्रतेने जाणवत आहे. रमेशदादा, नितीन लढ्ढा यांनी केंद्रशासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत २२00 कोटींचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्याची मंजुरी रखडल्याने या योजनांचा खर्च आज सुमारे ५ हजार कोटींवर पोहोचला आहे. विमानतळ शोभेचे शहराचा विकास करावयाचा असेल तर दळणवळण सेवा सहज उपलब्ध असणे आवश्यक असते. त्यातही विमानतळ असणे सर्वात महत्त्वाचे असते. ते असेल व त्यावर विमानसेवा सुरू असली तर मोठे उद्योग शहरात आणणे शक्य होईल, हे लक्षात घेऊनच आमदार सुरेशदादांनी मनपाच्या कर्तव्यात नसतानाही विमानतळ योजना हाती घेण्याची सूचना केली. नंतर शासनाने ही योजना परत मागितली तर त्यामार्गे लवकर पूर्ण व्हावी म्हणून ती शासनाला आडकाठी न आणता परतही केली. त्यामुळेच विमानतळाचे काम मार्गी लागले. मात्र ते या विमानतळाच्या उद््घाटन समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर तर अडीच वर्ष ते जळगावबाहेरच आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या अडीच वर्षात या विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला त्यासाठी पाठपुरावा करण्याची इच्छा झाली नाही किंवा पाठपुरावा करणे जमले नाही.
-----------
आमदार सुरेशदादांच्या अनुपस्थितीत राज्य शासनाने मनपाला सापत्नपणाची वागणूक देत अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले. मात्र जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने याबाबत शासनाला जाब विचारला नाही. मार्केट कराराच्या विषयांना दरवेळी स्थगिती देत हुडको कर्जफेडीचा मार्ग बंद करण्यात आला. त्याबाबत जाब विचारण्यासाठीही आमदार सुरेशदादांची उणीव तिव्रतेने जाणवली. विरोधकांनी केवळ अडथळे आणण्याचे काम केले.