शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राज्य शासनाची सापत्न वागणूक

By admin | Updated: October 9, 2014 15:02 IST

राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत.

जळगाव : राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत. परिणामी शासनस्तरावर जळगावचे प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी सक्षम नेताच नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे. 

सुरेशदादांनी विकास केला
शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आमदार सुरेशदादांनी दूरदृष्टी ठेवून वाघूर योजना केली नसती तर उन्हाळ्यात जळगावकरांना शहर सोडून जाण्याची वेळ आली असती. उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये १५-२0 दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना जळगावमध्ये मात्र दोन दिवसांआड पाणी मिळाले. दादांनी जळगावचा विकास केला. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पाहिले तर इतका नियोजनबद्ध विकास झालेला दिसत नाही. 
..तर जळगावचे होईल सिंगापूर
मनपाला निधीचा प्रश्न आहे. जनतेवर भार पडू न देता विकास करण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना ओढून आणणे गरजेचे आहे. मात्र आमदार सुरेशदादांसारखेच सक्षम नेतृत्वाची अनुपस्थिती तिव्रतेने जाणवत आहे. रमेशदादा, नितीन लढ्ढा यांनी केंद्रशासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत २२00 कोटींचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्याची मंजुरी रखडल्याने या योजनांचा खर्च आज सुमारे ५ हजार कोटींवर पोहोचला आहे. विमानतळ शोभेचे शहराचा विकास करावयाचा असेल तर दळणवळण सेवा सहज उपलब्ध असणे आवश्यक असते. त्यातही विमानतळ असणे सर्वात महत्त्वाचे असते. ते असेल व त्यावर विमानसेवा सुरू असली तर मोठे उद्योग शहरात आणणे शक्य होईल, हे लक्षात घेऊनच आमदार सुरेशदादांनी मनपाच्या कर्तव्यात नसतानाही विमानतळ योजना हाती घेण्याची सूचना केली. नंतर शासनाने ही योजना परत मागितली तर त्यामार्गे लवकर पूर्ण व्हावी म्हणून ती शासनाला आडकाठी न आणता परतही केली. त्यामुळेच विमानतळाचे काम मार्गी लागले. मात्र ते या विमानतळाच्या उद््घाटन समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर तर अडीच वर्ष ते जळगावबाहेरच आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या अडीच वर्षात या विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला त्यासाठी पाठपुरावा करण्याची इच्छा झाली नाही किंवा पाठपुरावा करणे जमले नाही.
-----------
आमदार सुरेशदादांच्या अनुपस्थितीत राज्य शासनाने मनपाला सापत्नपणाची वागणूक देत अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले. मात्र जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने याबाबत शासनाला जाब विचारला नाही. मार्केट कराराच्या विषयांना दरवेळी स्थगिती देत हुडको कर्जफेडीचा मार्ग बंद करण्यात आला. त्याबाबत जाब विचारण्यासाठीही आमदार सुरेशदादांची उणीव तिव्रतेने जाणवली. विरोधकांनी केवळ अडथळे आणण्याचे काम केले.