शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

राज्यात लोकसभेच्या ९ जागा साधू-संत लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:31 IST

निर्धार सभेत घोषणा

ठळक मुद्देराजकारण शुध्दीकरणाची भक्तगणांना दिली शपथ

जळगाव : देशभरात राजकीय पक्षांनी अनागोंदी माजविली असून लोकशाहीची क्रृर चेष्टा सुरु आहे. हिंदुत्ववादी संघटना देशभरात शंभर टक्के शुध्द उमेदवार लोकसभेत देणार असून त्याची घोषणा प्रयागराज येथे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात साधु संत ९ जागा लढविणार असल्याची घोषणा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शहरातील सागर पार्क येथे झालेल्या प्रवचन व निर्धार सभेत विविध संत व महाराजांनी केली़या सभेआधी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांतर्फे दुपारी ३ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली़ ही रॅली आकाशवाणी चौक, नविन बसस्थानक, कोर्ट चौक, टॉवर चौक, नेरी नाका, पांडे चौक, शिरसोली नाका परिसर येथून सागर पार्क येथे समाप्त झाली. सभेत सुरुवातीला सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज आकोटकर यांनी प्रवचन केले़ सत्यपाल महाराज म्हणाले की, नेता अधिकारप्रिय आणि कर्तव्यदक्ष असावा. नोट घेऊन वोट करू नका. अंधश्रध्देला बळी न पडता समाजसुधारकांचे विचार अंगीकारा. देशात कुपोषण, महिला अत्याचार याचे प्रमाण प्रचंड असून पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरावा असेही ते म्हणाले. त्यानंतर पालखी पूजन झाले. यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज, स्वामी देवगोपाल शास्त्री महाराज, स्वामी महाहंस महाराज, महंत रजनीशपुरी महाराज, आचार्य जनार्दन महाराज, हभप मंगेश महाराज, हभप दादा महाराज जोशी आदी उपस्थित होते.राजकारणात चांगली माणसे यावीराष्ट्रभक्ती आज काळाची गरज आहे. १०० टक्के मतदान होणे गरजेचे आहे. शुद्धीकरण अभियान कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. राजकारणात चांगले माणसे आली पाहिजे, सभेत विष्णू महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर स्वामी औसानंद महाराज म्हणाले की, भारत हा आस्था प्रधान देश आहे. राजकारण शुद्धीकरण हे गरजेचे झाले आहे. पैसा स्वार्थाने देशाला धोका आहे. ब्रह्मचारी देवगोपाल महाराज यांनी सांगितले, आताची परिस्थिती ही सत्तेतून पैसे आणि पैशापासून राजकारण सुरू आहे. भविष्यात सत्याचा विजय होणार आहे असेही ते म्हणाले.यावेळी सत्यपाल महाराज यांचे सप्त खंजिरीवादन आकर्षक ठरले. कार्यक्रमासाठी पाचोरा व चाळीसगावसह इतर ठिकाणचे भक्त परिवारातील सदस्य उपस्थित होते.प्रलोभनांना बळी पडू नकादेशात क्रांती आणण्यासाठी आणि परिवर्तनाची लाट येवून शुध्द राजकारण निर्मिती करण्यासाठी साधूसंत राजकारणात येणे महत्वाचे झाले आहे. कुप्रवृत्ती दूर करण्यासाठी जनतेने आता निष्पक्ष असणाऱ्या संत महाराजांना सत्तेत आणावे, असे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर त्यांनी राजकारण शुध्दीकरणाची उपस्थिताना शपथ दिली़ त्यात त्यांनी कुठल्याही प्रलोभनांना चांगल्या माणसांना मतदान करण्याचे आवाहन केले़ सभा यशस्वितेसाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमात जिल्हभरातून नागरिकांची उपस्थिती होती़ तसेच विविध माहितीपर स्टॉल्स् लावण्यात आलेले होते़