शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

राज्यात लोकसभेच्या ९ जागा साधू-संत लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:31 IST

निर्धार सभेत घोषणा

ठळक मुद्देराजकारण शुध्दीकरणाची भक्तगणांना दिली शपथ

जळगाव : देशभरात राजकीय पक्षांनी अनागोंदी माजविली असून लोकशाहीची क्रृर चेष्टा सुरु आहे. हिंदुत्ववादी संघटना देशभरात शंभर टक्के शुध्द उमेदवार लोकसभेत देणार असून त्याची घोषणा प्रयागराज येथे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात साधु संत ९ जागा लढविणार असल्याची घोषणा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शहरातील सागर पार्क येथे झालेल्या प्रवचन व निर्धार सभेत विविध संत व महाराजांनी केली़या सभेआधी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांतर्फे दुपारी ३ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली़ ही रॅली आकाशवाणी चौक, नविन बसस्थानक, कोर्ट चौक, टॉवर चौक, नेरी नाका, पांडे चौक, शिरसोली नाका परिसर येथून सागर पार्क येथे समाप्त झाली. सभेत सुरुवातीला सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज आकोटकर यांनी प्रवचन केले़ सत्यपाल महाराज म्हणाले की, नेता अधिकारप्रिय आणि कर्तव्यदक्ष असावा. नोट घेऊन वोट करू नका. अंधश्रध्देला बळी न पडता समाजसुधारकांचे विचार अंगीकारा. देशात कुपोषण, महिला अत्याचार याचे प्रमाण प्रचंड असून पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरावा असेही ते म्हणाले. त्यानंतर पालखी पूजन झाले. यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज, स्वामी देवगोपाल शास्त्री महाराज, स्वामी महाहंस महाराज, महंत रजनीशपुरी महाराज, आचार्य जनार्दन महाराज, हभप मंगेश महाराज, हभप दादा महाराज जोशी आदी उपस्थित होते.राजकारणात चांगली माणसे यावीराष्ट्रभक्ती आज काळाची गरज आहे. १०० टक्के मतदान होणे गरजेचे आहे. शुद्धीकरण अभियान कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. राजकारणात चांगले माणसे आली पाहिजे, सभेत विष्णू महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर स्वामी औसानंद महाराज म्हणाले की, भारत हा आस्था प्रधान देश आहे. राजकारण शुद्धीकरण हे गरजेचे झाले आहे. पैसा स्वार्थाने देशाला धोका आहे. ब्रह्मचारी देवगोपाल महाराज यांनी सांगितले, आताची परिस्थिती ही सत्तेतून पैसे आणि पैशापासून राजकारण सुरू आहे. भविष्यात सत्याचा विजय होणार आहे असेही ते म्हणाले.यावेळी सत्यपाल महाराज यांचे सप्त खंजिरीवादन आकर्षक ठरले. कार्यक्रमासाठी पाचोरा व चाळीसगावसह इतर ठिकाणचे भक्त परिवारातील सदस्य उपस्थित होते.प्रलोभनांना बळी पडू नकादेशात क्रांती आणण्यासाठी आणि परिवर्तनाची लाट येवून शुध्द राजकारण निर्मिती करण्यासाठी साधूसंत राजकारणात येणे महत्वाचे झाले आहे. कुप्रवृत्ती दूर करण्यासाठी जनतेने आता निष्पक्ष असणाऱ्या संत महाराजांना सत्तेत आणावे, असे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर त्यांनी राजकारण शुध्दीकरणाची उपस्थिताना शपथ दिली़ त्यात त्यांनी कुठल्याही प्रलोभनांना चांगल्या माणसांना मतदान करण्याचे आवाहन केले़ सभा यशस्वितेसाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमात जिल्हभरातून नागरिकांची उपस्थिती होती़ तसेच विविध माहितीपर स्टॉल्स् लावण्यात आलेले होते़