शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लोकसभेच्या ९ जागा साधू-संत लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:31 IST

निर्धार सभेत घोषणा

ठळक मुद्देराजकारण शुध्दीकरणाची भक्तगणांना दिली शपथ

जळगाव : देशभरात राजकीय पक्षांनी अनागोंदी माजविली असून लोकशाहीची क्रृर चेष्टा सुरु आहे. हिंदुत्ववादी संघटना देशभरात शंभर टक्के शुध्द उमेदवार लोकसभेत देणार असून त्याची घोषणा प्रयागराज येथे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात साधु संत ९ जागा लढविणार असल्याची घोषणा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शहरातील सागर पार्क येथे झालेल्या प्रवचन व निर्धार सभेत विविध संत व महाराजांनी केली़या सभेआधी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांतर्फे दुपारी ३ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली़ ही रॅली आकाशवाणी चौक, नविन बसस्थानक, कोर्ट चौक, टॉवर चौक, नेरी नाका, पांडे चौक, शिरसोली नाका परिसर येथून सागर पार्क येथे समाप्त झाली. सभेत सुरुवातीला सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज आकोटकर यांनी प्रवचन केले़ सत्यपाल महाराज म्हणाले की, नेता अधिकारप्रिय आणि कर्तव्यदक्ष असावा. नोट घेऊन वोट करू नका. अंधश्रध्देला बळी न पडता समाजसुधारकांचे विचार अंगीकारा. देशात कुपोषण, महिला अत्याचार याचे प्रमाण प्रचंड असून पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरावा असेही ते म्हणाले. त्यानंतर पालखी पूजन झाले. यावेळी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज, स्वामी देवगोपाल शास्त्री महाराज, स्वामी महाहंस महाराज, महंत रजनीशपुरी महाराज, आचार्य जनार्दन महाराज, हभप मंगेश महाराज, हभप दादा महाराज जोशी आदी उपस्थित होते.राजकारणात चांगली माणसे यावीराष्ट्रभक्ती आज काळाची गरज आहे. १०० टक्के मतदान होणे गरजेचे आहे. शुद्धीकरण अभियान कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. राजकारणात चांगले माणसे आली पाहिजे, सभेत विष्णू महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर स्वामी औसानंद महाराज म्हणाले की, भारत हा आस्था प्रधान देश आहे. राजकारण शुद्धीकरण हे गरजेचे झाले आहे. पैसा स्वार्थाने देशाला धोका आहे. ब्रह्मचारी देवगोपाल महाराज यांनी सांगितले, आताची परिस्थिती ही सत्तेतून पैसे आणि पैशापासून राजकारण सुरू आहे. भविष्यात सत्याचा विजय होणार आहे असेही ते म्हणाले.यावेळी सत्यपाल महाराज यांचे सप्त खंजिरीवादन आकर्षक ठरले. कार्यक्रमासाठी पाचोरा व चाळीसगावसह इतर ठिकाणचे भक्त परिवारातील सदस्य उपस्थित होते.प्रलोभनांना बळी पडू नकादेशात क्रांती आणण्यासाठी आणि परिवर्तनाची लाट येवून शुध्द राजकारण निर्मिती करण्यासाठी साधूसंत राजकारणात येणे महत्वाचे झाले आहे. कुप्रवृत्ती दूर करण्यासाठी जनतेने आता निष्पक्ष असणाऱ्या संत महाराजांना सत्तेत आणावे, असे शांतीगिरी महाराज यांनी सांगितले़ त्यानंतर त्यांनी राजकारण शुध्दीकरणाची उपस्थिताना शपथ दिली़ त्यात त्यांनी कुठल्याही प्रलोभनांना चांगल्या माणसांना मतदान करण्याचे आवाहन केले़ सभा यशस्वितेसाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या अनुयायांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमात जिल्हभरातून नागरिकांची उपस्थिती होती़ तसेच विविध माहितीपर स्टॉल्स् लावण्यात आलेले होते़