शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

दुकानांच्या तळघरांमध्ये साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे जवळील दुकानांमध्ये पाण्याचा पाझर सुरू झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. दोन ते तीन दुकानांमधील तळघरांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री धुवाॅंधार पाऊस झाला होता़ दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाने बॅटिंग केली. त्यामुळे शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात प्रचंड पाणी साचले. त्यामुळे टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्याला असलेल्या दोन ते तीन दुकानांमधील तळघरांमध्ये त्या खड्ड्यातील पाण्यामुळे पाझर सुरू झाला. यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी तळघरात साचले. एका दुकानातील दोन ते तीन कॉम्प्युटर, लॅपटॉप तसेच इन्व्हर्टर, पडदे, गादी व कपडे आदी पाण्यात भिजल्याने एक ते दोन लाखांचे नुकसान झाले होते. दरम्यान, शनिवारीसुध्दा असाच प्रकार घडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

गेल्या तीस वर्षांत असे कधीही झाले नाही. उड्डाणपुलासाठी केलेल्या खड्ड्यामध्ये पाऊस झाल्यानंतर प्रचंड पाणी साचते. नंतर हे पाणी दुकानातील तळमजल्यात शिरत आहे. मात्र, त्याचा स्रोत कुठून आहे, हे कळले नाही. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

- बलजितसिंग छाबडा, व्यावसायिक