शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यासांठी एसटीचा प्रवास सुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : शहरापासून वाड्यावस्तीपर्यंत जाण्यासाठी आजही लाल परीच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. महामंडळाच्या जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी फक्त ...

जळगाव : शहरापासून वाड्यावस्तीपर्यंत जाण्यासाठी आजही लाल परीच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. महामंडळाच्या जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी फक्त बोटावर मोजण्याइतक्याच चालकांकडून अपघाताचे प्रकार घडल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यासह सुरत, बडोदा, सेल्वासा, उधना, अंकलेश्वर या ठिकाणी सेवा देण्यात येत आहे. `प्रवासी हेच आमचे दैवत ` या म्हणीप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी महामंडळातर्फे चालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी व सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच कार्यशाळेत बसेसची वेळोवेळी तपासणी करुन, दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी २५ ते ३० चालकांकडून अपघात झाला आहे. यामध्ये नेमकी आकडेवारी मात्र आगार प्रशासनातर्फे देण्यात आली नाही.

इन्फो :

चालकांना वेळोवेळी सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. चालकांकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, जळगाव विभाग

जिल्ह्यातील चालक १ हजार ६२६

विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार

१० वर्षापेक्षा जास्त सेवा ३९ चालक

१५ वर्षापेक्षा जास्त सेवा २१ चालक

इन्फो :

७० ला स्पीड लॉक

महामंडळातर्फे चालकांना बसेस स्पीड ठरवून देण्यात आला आहे. जास्तीत जास्त ताशी ७० किलोमीटर वेगाने बस चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे बसचा ७० ला स्पीड लॉक करण्यात आला आहे. मात्र, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून बहुतांश चालक ताशी ५० ते ५५ वेगानेच बस चालवितात. तसेच ज्या मार्गावर रस्ते अत्यंत खराब आहेत, त्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज घेऊन ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने चालविण्याला प्राधान्य दिले जाते.

इन्फो :

प्रवाशांचा एसटीच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासावर विश्वास असल्याने, आजही नागरिक जवळच्या किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आम्ही खबरदारीनेच बसेस चालवितो.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो:

शहरापेक्षा ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असल्यामुळे, या ठिकाणी बसेस चालविणे मोठे आव्हान असते. अशा वेळी प्रत्येक चालक प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच बस चालवित असतो.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो :

माईल्ड स्टीलच्या बसेसमुळे अपघात कमी

सध्या महामंडळाच्या ताफ्यात ॲल्युमिनिअम बांधणीतील बसेस असल्या तरी गेल्या वर्षापासून माईल्ड स्टीलच्या बसेसही दाखल झाल्या आहेत. ॲल्युमिनिअम ऐवजी माईल्ड स्टीलने या नव्या बसेसची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. यामुळे अपघात झाल्यास प्रवाशांना इजा कमी होईल, अशा प्रकारची बांधणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा या बसेसमध्ये करण्यात आल्या आहेत.