शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

सर्वसामान्यासांठी एसटीचा प्रवास सुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : शहरापासून वाड्यावस्तीपर्यंत जाण्यासाठी आजही लाल परीच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. महामंडळाच्या जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी फक्त ...

जळगाव : शहरापासून वाड्यावस्तीपर्यंत जाण्यासाठी आजही लाल परीच्या प्रवासालाच प्राधान्य दिले जात आहे. महामंडळाच्या जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी फक्त बोटावर मोजण्याइतक्याच चालकांकडून अपघाताचे प्रकार घडल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यासह सुरत, बडोदा, सेल्वासा, उधना, अंकलेश्वर या ठिकाणी सेवा देण्यात येत आहे. `प्रवासी हेच आमचे दैवत ` या म्हणीप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी महामंडळातर्फे चालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी व सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच कार्यशाळेत बसेसची वेळोवेळी तपासणी करुन, दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव आगारातील २६८ चालकांपैकी २५ ते ३० चालकांकडून अपघात झाला आहे. यामध्ये नेमकी आकडेवारी मात्र आगार प्रशासनातर्फे देण्यात आली नाही.

इन्फो :

चालकांना वेळोवेळी सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. चालकांकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, जळगाव विभाग

जिल्ह्यातील चालक १ हजार ६२६

विना अपघात बस चालविली म्हणून सत्कार

१० वर्षापेक्षा जास्त सेवा ३९ चालक

१५ वर्षापेक्षा जास्त सेवा २१ चालक

इन्फो :

७० ला स्पीड लॉक

महामंडळातर्फे चालकांना बसेस स्पीड ठरवून देण्यात आला आहे. जास्तीत जास्त ताशी ७० किलोमीटर वेगाने बस चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे बसचा ७० ला स्पीड लॉक करण्यात आला आहे. मात्र, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून बहुतांश चालक ताशी ५० ते ५५ वेगानेच बस चालवितात. तसेच ज्या मार्गावर रस्ते अत्यंत खराब आहेत, त्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज घेऊन ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने चालविण्याला प्राधान्य दिले जाते.

इन्फो :

प्रवाशांचा एसटीच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासावर विश्वास असल्याने, आजही नागरिक जवळच्या किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आम्ही खबरदारीनेच बसेस चालवितो.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो:

शहरापेक्षा ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असल्यामुळे, या ठिकाणी बसेस चालविणे मोठे आव्हान असते. अशा वेळी प्रत्येक चालक प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच बस चालवित असतो.

एक चालक, जळगाव आगार

इन्फो :

माईल्ड स्टीलच्या बसेसमुळे अपघात कमी

सध्या महामंडळाच्या ताफ्यात ॲल्युमिनिअम बांधणीतील बसेस असल्या तरी गेल्या वर्षापासून माईल्ड स्टीलच्या बसेसही दाखल झाल्या आहेत. ॲल्युमिनिअम ऐवजी माईल्ड स्टीलने या नव्या बसेसची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. यामुळे अपघात झाल्यास प्रवाशांना इजा कमी होईल, अशा प्रकारची बांधणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा या बसेसमध्ये करण्यात आल्या आहेत.