शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एस.टी. च्या १२५ बसेसनी अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST

जळगाव : काही मार्गावरील रस्ते चांगले असले, तरी बहुतांश ग्रामीण भागातील रस्त्यांची मात्र आजही दुरवस्था आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ...

जळगाव : काही मार्गावरील रस्ते चांगले असले, तरी बहुतांश ग्रामीण भागातील रस्त्यांची मात्र आजही दुरवस्था आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बसेस पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले असून, इतर तांत्रिक कारणांमुळेही रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षांत जळगाव आगारातील २०० बसेस रस्त्याच्या मध्येच बंद पडल्याचे प्रकार घडले असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारातून दिवसभर बसेसची वाहतूक सुरू असते. राज्यासह परराज्यातही बसेस धावत असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कार्यशाळेत वेळोवेळी बसेसचे दुरूस्तीचे काम केले जाते. बसेसची सर्व प्रकारची तपासणी करुनच बाहेरगावी बसेस रवाना होतात. असे असले तरी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गेल्या दोन वर्षांत जळगाव आगारातील अनेक बसेस रस्त्यात पंक्चर झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये जळगाव- औरंगाबाद, जळगाव-चाळीसगाव व जळगाव-धुळे या मार्गांवर रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महामंडळाच्या बसेसचे नुकसान झाले. यामध्ये बसेसच्या टायरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

विशेष म्हणजे रस्त्यांचे काम सुरू असतांना, अनेकदा बस पंक्चर झाल्याचे प्रकार झाले. बस पंक्चर किंवा तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यावर आगार प्रशासनातर्फे तात्काळ त्या मार्गावरील दुसऱ्या गाडीत किंवा जवळच्या आगारातून दुसरी बस पाठवून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

इन्फो :

रस्त्यात बस पंक्चर किंवा तांत्रिक कारणामुळे बस बंद पडल्यावर प्रवाशांना त्या मार्गावरील दुसऱ्यामध्ये बसविण्यात येते. तसेच शक्य झाले तर त्या मार्गावरील जवळच्या आगारातून दुसरी बस पाठवून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात येते. मात्र, आता रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रमाण खुपच कमी आहे.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार

इन्फो:

रस्त्यात बस बंद पडण्याची ही आहेत कारणे

महामंडळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रस्त्यामध्ये कधी ब्रेक डाऊन झाल्यामुळे बस बंद पडते किंवा टायर पंक्चर झाल्यामुळे बंद पडत असल्याचे सांगण्यात आले. कधी-कधी अचानक इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यावरही बस बंद पडत आहेत. तसेच जर बस बंद पडली तर तात्काळ दुसऱ्या जवळच्या आगारातून बस उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

दहा वर्षांवरील मोजक्याच बसेस

सध्या महामंडळाच्या जळगाव विभागाकडे सव्वा सातशेच्या घरात बसेस आहेत. या मध्ये बोटावर मोजण्या इतक्याच दहा वर्षापेक्षा जास्त वयोमान असलेल्या बसेस आहेत. तर बहुतांश बसेस या १ ते ८ वर्षांच्या वयोमान दरम्यानच्या आहेत. जिल्ह्यातील आगारांमध्ये जास्तीत-जास्त १२ वर्षापर्यंत बसेसचा वापर केला जात असून, १२ वर्षापुढील बसेस या स्क्रॅपमध्ये काढल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

----

इन्फो ::

जिल्ह्यातील एसटी बसेस ७२५

इन्फो :

एसटीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला १२ कोटी खर्च

जळगाव विभागातील सर्व आगार मिळून एसटी बसेसच्या मेन्टेंन्ससाठी वर्षाला १२ कोटींच्या घरात खर्च येत आहे. महामंडळाच्या उत्पन्नाचा बराचसा पैसा मेन्टेंन्सवर खर्च होत आहे. यात वर्षाला सर्वाधिक दोन लाखांचा खर्च टायरवर होत आहे. तसेच इंजिन दुरूस्ती, गियर बॉक्स, अपघातग्रस्त वाहनाची दुरूस्ती, दारे-खिड्यांची दुरूस्ती आदी विविध प्रकारच्या ३० ते ३५ सेक्शनच्या माध्यमातुन कार्यशाळेत बसेसच्या मेन्टेंन्सवर वर्षाला १२ कोटींच्या घरात खर्च होत आहे.