शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

दुहेरी खून प्रकरणात पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून प्रकरणात एमआयडीसी पोलिसांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, मुरलीधर पाटीलच्या ब्रोकरकडे कामाला होते. त्या प्रकारची सलग तीन दिवसांपासून झाडाझडती सुरू आहे. त्याच्या भोवतीच बहुतांश तपास फिरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पोलिसांनी संशयावरुन आधी १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. रविवारीदेखील आठ जणांची चौकशी करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखादेखील रात्रंदिवस कामाला लागलेली आहे. प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहे. या खून प्रकरणात ओळखीच्या व्यक्तिचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटना घडल्याच्या दिवसापासून या परिसरात कोणा कोणाचा वावर होता. याचीदेखील माहिती काढली जात आहे. त्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. श्वानपथक व फॉरेन्सिक पथक या दोघांचीही मदत घेतली जात आहे. आशाबाई पाटील यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय असला तरी या घटनेशी त्याचा कितपत संबंध आहे, याचीदेखील रविवारी पडताळणी करण्यात आली. या दाम्पत्याने कोणा-कोणाला किती रुपये व्याजाने दिलेले आहेत, कोणाचे पैसे परत मिळालेले आहेत, कोणाकडे किती बाकी आहे ? याचीही माहिती काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा या गावात काहीतरी धागे-दोरे मिळू शकतील, असा अंदाज किंबहुना तशी खात्री झाल्यानेच एक पथक त्याची पडताळणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तीन दिवसांपासून कुसुंबा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे. रविवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीदेखील या भागात जाऊन काही लोकांची चौकशी केली. मुरलीधर पाटील यांचे घर गावाच्या अगदी शेवटी असल्याने तेथे नेमका कोणाचा वावर होता, हे कोणी सांगायला तयार नाही. या घराला लागूनच शेत शिवार आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना पळायला हा मार्ग सोपा होता.

संशय असलेल्या व्यक्तिचा मोबाईल बंद

पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून या भागात येणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एकाच ठिकाणी कॅमेरे आहेत. मात्र, तेथून काहीच हाती लागले नाही. ज्या व्यक्तींवर संशय आहे. त्या व्यक्तिचा घटनेच्या दिवशी या भागातून वावर झाला आहे का? याचेही फुटेज तपासले जात असून, मोबाईलबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीवर संशय होता, त्यापैकी एकाचा मोबाईल घटनेच्या दिवसापासून बंद येत आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावला आहे.