शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुहेरी खून प्रकरणात पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून प्रकरणात एमआयडीसी पोलिसांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, मुरलीधर पाटीलच्या ब्रोकरकडे कामाला होते. त्या प्रकारची सलग तीन दिवसांपासून झाडाझडती सुरू आहे. त्याच्या भोवतीच बहुतांश तपास फिरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पोलिसांनी संशयावरुन आधी १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. रविवारीदेखील आठ जणांची चौकशी करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखादेखील रात्रंदिवस कामाला लागलेली आहे. प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहे. या खून प्रकरणात ओळखीच्या व्यक्तिचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटना घडल्याच्या दिवसापासून या परिसरात कोणा कोणाचा वावर होता. याचीदेखील माहिती काढली जात आहे. त्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. श्वानपथक व फॉरेन्सिक पथक या दोघांचीही मदत घेतली जात आहे. आशाबाई पाटील यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय असला तरी या घटनेशी त्याचा कितपत संबंध आहे, याचीदेखील रविवारी पडताळणी करण्यात आली. या दाम्पत्याने कोणा-कोणाला किती रुपये व्याजाने दिलेले आहेत, कोणाचे पैसे परत मिळालेले आहेत, कोणाकडे किती बाकी आहे ? याचीही माहिती काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा या गावात काहीतरी धागे-दोरे मिळू शकतील, असा अंदाज किंबहुना तशी खात्री झाल्यानेच एक पथक त्याची पडताळणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तीन दिवसांपासून कुसुंबा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे. रविवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीदेखील या भागात जाऊन काही लोकांची चौकशी केली. मुरलीधर पाटील यांचे घर गावाच्या अगदी शेवटी असल्याने तेथे नेमका कोणाचा वावर होता, हे कोणी सांगायला तयार नाही. या घराला लागूनच शेत शिवार आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना पळायला हा मार्ग सोपा होता.

संशय असलेल्या व्यक्तिचा मोबाईल बंद

पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून या भागात येणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एकाच ठिकाणी कॅमेरे आहेत. मात्र, तेथून काहीच हाती लागले नाही. ज्या व्यक्तींवर संशय आहे. त्या व्यक्तिचा घटनेच्या दिवशी या भागातून वावर झाला आहे का? याचेही फुटेज तपासले जात असून, मोबाईलबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीवर संशय होता, त्यापैकी एकाचा मोबाईल घटनेच्या दिवसापासून बंद येत आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावला आहे.