शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

दुहेरी खून प्रकरणात पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून प्रकरणात एमआयडीसी पोलिसांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, मुरलीधर पाटीलच्या ब्रोकरकडे कामाला होते. त्या प्रकारची सलग तीन दिवसांपासून झाडाझडती सुरू आहे. त्याच्या भोवतीच बहुतांश तपास फिरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पोलिसांनी संशयावरुन आधी १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. रविवारीदेखील आठ जणांची चौकशी करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखादेखील रात्रंदिवस कामाला लागलेली आहे. प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहे. या खून प्रकरणात ओळखीच्या व्यक्तिचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटना घडल्याच्या दिवसापासून या परिसरात कोणा कोणाचा वावर होता. याचीदेखील माहिती काढली जात आहे. त्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. श्वानपथक व फॉरेन्सिक पथक या दोघांचीही मदत घेतली जात आहे. आशाबाई पाटील यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय असला तरी या घटनेशी त्याचा कितपत संबंध आहे, याचीदेखील रविवारी पडताळणी करण्यात आली. या दाम्पत्याने कोणा-कोणाला किती रुपये व्याजाने दिलेले आहेत, कोणाचे पैसे परत मिळालेले आहेत, कोणाकडे किती बाकी आहे ? याचीही माहिती काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा या गावात काहीतरी धागे-दोरे मिळू शकतील, असा अंदाज किंबहुना तशी खात्री झाल्यानेच एक पथक त्याची पडताळणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तीन दिवसांपासून कुसुंबा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे. रविवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीदेखील या भागात जाऊन काही लोकांची चौकशी केली. मुरलीधर पाटील यांचे घर गावाच्या अगदी शेवटी असल्याने तेथे नेमका कोणाचा वावर होता, हे कोणी सांगायला तयार नाही. या घराला लागूनच शेत शिवार आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना पळायला हा मार्ग सोपा होता.

संशय असलेल्या व्यक्तिचा मोबाईल बंद

पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून या भागात येणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एकाच ठिकाणी कॅमेरे आहेत. मात्र, तेथून काहीच हाती लागले नाही. ज्या व्यक्तींवर संशय आहे. त्या व्यक्तिचा घटनेच्या दिवशी या भागातून वावर झाला आहे का? याचेही फुटेज तपासले जात असून, मोबाईलबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीवर संशय होता, त्यापैकी एकाचा मोबाईल घटनेच्या दिवसापासून बंद येत आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावला आहे.