शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

महापालिकेकडून फवारणी केवळ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी प्रभावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा न राबविता लॉकडाऊन व जनता कर्फ्यू अशा पर्यायांवर महापालिकेकडून काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा महापालिका प्रशासनाने राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना महापालिका प्रशासन दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे.

जळगाव शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला २०० च्या सरासरीने वाढत आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील मनपा प्रशासनाने रुग्ण शोधमोहीम, रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालणे अशी प्रभावी यंत्रणा राबविल्यामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आले होते. मात्र, महापालिकेकडे तीच यंत्रणा असतानादेखील यावेळेस महापालिका प्रशासन काहीअंशी अपयशी ठरताना दिसून येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात घेतली जात नाही खबरदारी

फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही. एखाद्या भागात लग्न आढळल्यानंतर केवळ संबंधित रुग्णाचे घर सील करण्यात आले होते. अनेक दिवस हीच प्रक्रिया महापालिकेने राबवली. रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर देखील अजूनही महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यास मनपाला अपयश आले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर रुग्ण शोधमोहीम राबविली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी शहरात होताना फारसे दिसून येत नाही. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९७ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

रुग्णाकडून मागणी केल्यावरदेखील केली जात नाही फवारणी

१. शहरात औषध फवारणीचे कामदेखील धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील गल्लोगल्लींमध्ये फवारणी करण्यात आली होती. मात्र, या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असताना देखील अनेक भागांमध्ये अद्यापही फवारणी करण्यात आलेले नाही.

२. यासह गृह विलगीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. मात्र, संबंधित रुग्ण घरी गेल्यानंतर त्याच्याकडे देखील महापालिकेकडून फारसे लक्ष ठेवले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोट

महापालिका प्रशासनाकडून रुग्ण आढळल्यानंतर संबंधित भागात तत्काळ औषध फवारणी केली जात असते. तसेच मलेरिया विभागाकडून देखील यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी मनपा