शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

मतविभाजनाचा फटका

By admin | Updated: October 20, 2014 10:06 IST

एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पंचरंगी लढतीतील मतविभाजनाचा फटका शिवसेनेला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाल्यामुळे डॉ.सतीश भास्करराव पाटील यांचा विजय झाला.

■ एरंडोल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या पंचरंगी लढतीतील मतविभाजनाचा फटका शिवसेनेला बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला लाभ झाल्यामुळे डॉ.सतीश भास्करराव पाटील यांचा विजय झाला. एकंदरीत पंचरंगी सामन्यात भाजपा, मनसे या पक्षांच्या उमेदवारांनी अपेक्षेपेक्षा अधिक मते घेतल्यामुळे शिवसेनेचे निवडणुकीचे गणित बदलले व त्यांना पराभव पत्करावा लागला. विजयी उमेदवार डॉ.पाटील यांना पारोळा शहरासह ग्रामीण भागात, तसेच कासोदा, गिरड-आमडदे जि.प.गट या ठिकाणी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच मुस्लीम मतदारांनीदेखील घड्याळाच्या बाजूने कौल दिला आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पाटील यांचा पराभव झाला. मात्र ही माझी शेवटची निवडणूक आहे, या त्यांनी दिलेल्या हाकेला मतदारांनी प्रतिसाद दिला.. उलटपक्षी अति आत्मविश्‍वास, दुभंगलेली युती, भाजपाचे सुडाचे राजकारण, मत विनभाजनामुळे बदललेली समीकरणे यामुळे शिवसेनेचे चिमणराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपाने ऐनवेळी शिवसेनेचे माजी जि.प.उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या हातात 'कमळ' दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. याचा लाभ उमेदवाराचे मताधिक्य वाढण्यास झाला. मात्र तरी विजय मिळविता आला नाही. परंतु त्यामुळे चिमणराव पाटील यांच्या विजयाचे गणित बिघडले हे निश्‍चित आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून सतत जनसंपर्क ठेवणारे मनसेचे युवा नेते नरेंद्र पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रथमच एंट्री करून प्रतिस्पध्र्यांना कडवे आव्हान दिले. माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनीदेखील पुतण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र अपेक्षित यश मिळण्यात तेही अयशस्वी ठरले. त्यांच्या प्रचाराच्या व्यूहरचनेमुळे एरंडोलमध्ये 'रेल्वे इंजीन' बाजी मारणार असे चित्र निर्माण झाले होते. माजी आमदार पारूताई वाघ यांचे पुत्र डॉ.प्रवीण वाघ यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी 'पंजा' दारोदार पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फारसा प्रभाव मतदारसंघात कुठेही दिसून आला नाही. निवडणुकीच्या रिंगणातील इतर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला नाही. पण दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या चिमणराव पाटलांना मात्र ते अडथळ्याचे जरूर ठरले. त्यामुळे अपक्षांनीही आपले महत्त्व पटविल्याचे दिसते. या निकालावरून भविष्यात तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच नव्याने होणार्‍या घडामोडींमुळे मतदारसंघाचा कायापालट होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.