शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाटणादेवीच्या पायी बाराव्या शतकातील दीपमाळींचे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:34 IST

बाराव्या शतकातील हेमाडापंथीय मंदिर कलेचा उत्तम नमुना असणा-या पाटणादेवीच्या पायी याच शतकातील पुरातन दोन दीपमाळीदेखील आहेत.

ठळक मुद्देचंडिकेचे वरदहस्त शक्तिपीठअहिल्यादेवी होळकरांनी केला होता जीर्णोद्धार

चाळीसगाव : बाराव्या शतकातील हेमाडापंथीय मंदिर कलेचा उत्तम नमुना असणा-या पाटणादेवीच्या पायी याच शतकातील पुरातन दोन दीपमाळीदेखील आहेत. महाराष्ट्रातील देवीच्या ५१ प्रमुख शक्तिपीठांपैकी पाटणानिवासिनी चंडिका मातेचे हे वरदहस्त शक्तिपीठ आहे. यंदा कोरोनामुळे मंदिर बंद असून नवरात्रोत्सवाचा जागरदेखील थांबला आहे. गेल्या अनेक शतकांपासून पुरातन दीपमाळींचे वैभव मात्र आजही टिकून आहे.सह्यगिरीच्या पोटातून निघालेल्या डोंगररांगाची अभेद्य तटबंदी, वृक्षराजींचे हिरवेगार लावण्य, उंच कड्यांवरुन कोसळणारे शुभ्रधवल धबधबे, जंगली श्वापदांचा वावर, दुर्मिळ वनस्पती आणि पक्षांचा अधिवास. धवलतीर्थ धबधब्याचा मनोहारी प्रपात. पाटणादेवी परिसरात निसर्ग असा खुलून स्वागताला उभा राहतो. यापरिसराला खान्देशाचे नंदनवनही म्हटले जाते. साडेसहाशे हेक्टर परिसरात हा जंगल परिसर व्यापला आहे. शेजारीच औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्याचा परिसर असल्याने विपूल प्राणी संपदा येथे आढळते. देवीचे मंदिर आणि जंगल वैविध्यामुळे येथे वर्षभर पर्यटक, भक्तांचा राबता असतो. यावर्षी गेल्या सहा महिन्यांपासून पाटणादेवी परिसर कोरोनामुळे बंद आहे. दरवर्षी चंडिकामातेचा नवरात्रोत्स धुमधडाक्यात साजरा होतो. टाळेबंदीत हे सर्वच थांबले आहे.वरदहस्त शक्तिपीठ, दीपमाळांचे अभिजात लावण्यपाटणादेवीचे मंदिर हे बाराव्या शतकात उभारले गेले आहे. साधारण ११२८ हा मंदिर उभारणीचा काळ सांगितला जातो. राज्यभरातील देवीच्या प्रमुख ५१ शक्तिपीठांपैकी चंडिकादेवीचे हे वरदहस्त शक्तिपीठ आहे. यामुळे राज्यभरातुनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. हेमाडपंथीय मंदिर स्थापत्यांचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या मंदिराच्या पायथ्याशी दोन मोठ्या दीपमाळीही उभारल्या आहेत. जवळपास ३० ते ३५ फूट त्यांची उंची आहे. कलाकुसरीच्या दीपमाळींमुळे मंदिराला अभिजात सौदर्य प्राप्त झाले आहे. अल्लाउद्दीन खिजलीच्या आक्रमणात पाटणादेवी मंदिराची देखील नासधूस झाली होती. पुढे अहिल्याबाई होळकरांच्या काळात मंदिराची डागडूजी तर डाव्या हाताकडील दीपमाळीचा जीर्णोद्धार केला गेला. १९७२ मध्ये भारतीय पुरातत्व विभागानेदेखील दीपमाळींची दुरुस्ती करुन हे वैभव जपले.दीपमाळी पेटविण्याचा मान न्हावे येथे पाटीलकी भूषविणा-या ठाकूर बांधवांना दिला गेला आहे. गेल्या काही पिढ्या त्यांनी तो निभावलाही. कालौघात पुरातत्व विभागाने दीपमाळी पेटविण्यास मनाई केली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमChalisgaonचाळीसगाव