शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST

जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे... जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, या अभंगावरून असे ...

जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे...

जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, या अभंगावरून असे दिसते की, आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातील संत निष्काम कर्म करणारे आहेत. स्वतःला काही नको, जगाच्या कल्याणाची त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी विचार केला आहे.

सामान्य माणसापासून त्यांच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या अंगी आहे. वारकरी भागवत धर्म जोपासणारे संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान देव काका, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत मीरा, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत जोगा परमानंद, संत सेना न्हावी, संत सच्चिदानंद बाबा, संत कान्होपात्रा, संत परिस भागवत, संत चोखामेळा, संत कबीर दास, संत विठोबा राय, संत जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, संत झेंडूजी महाराज, असे ज्ञानवंत प्रतिभावान संत होऊन गेले.

त्यांना त्यांच्या भक्तितत्त्वाचा किंवा त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन नव्हते करायचे. त्यांनी समता, ममता व सर्व आबालवृद्ध लोकांचे कल्याण आणि उद्धारासाठी भगवतभक्ती नामसंकीर्तन आधारले. त्यांना भागवत धर्म जोपासायचा होता, त्यांनी भागवत धर्माचे वेद, उपनिषद, गीता, १८ पुराणे यातून भागवत धर्माचा प्रसार केला. भागवत धर्माचे मूळ वैदिक पौराणिक परंपरेत आहे. जसे जीव शिव आहे, तसेच भागवत धर्म म्हणजे भक्तिमार्ग आहे. हे आचरणात आणणारे संत हे तत्त्वज्ञान भागवत धर्माचे मुख्य दैवत विठ्ठल परब्रह्म आहे. वारकऱ्यांचे भगवान पंढरपुरातील कडेवर हात ठेवून, उभा असेलला स्वयंभू शाश्वत विश्वरूप तेच परमेश्वराचे आणि सर्वांचे यथार्थ स्वरूप आहे. या विश्वालाच विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होय, असे संतांनी सांगितले आहे. विश्व सेवा म्हणजे विठ्ठलाची भक्ती ‘हे विश्वची माझे घर’ ही कल्पना यातून उगम पावते, हेच वरील संतांचे समाजप्रबोधन आहे. संतांनी भोळ्याभाबड्या जनतेची धार्मिक, अंधविश्वास, अंधश्रद्धा, प्रतिमा पूजा आणि चमत्कार, अशा दंत कथांमधून सोडवणूक करून जनतेला यथार्थ भक्ती (विश्वास) श्रद्धा यांची शिकवण दिली. संतांनी अनुभवाचे अधिष्ठान आश्वासन दिले आहे. सर्वधर्मसमभावाचे तत्त्व भागवत धर्मीय संतांनी जोपासले आहे.

निरूपण : ह.भ.प. गोपाळ महाराज ढाके